Tuesday, May 20, 2025
Homeनगरसाबळे बंधूंची टोळी दोन वर्षांकरिता हद्दपार

साबळे बंधूंची टोळी दोन वर्षांकरिता हद्दपार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणार्‍या नगर शहरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दोन वर्षांकरिता नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्याबाबतचा आदेश त्यांनी नुकताच काढला आहे. टोळी प्रमुख आकाश उर्फ अक्षय जिजाराम साबळे व टोळी सदस्य अमोल जिजाराम साबळे (दोघे रा. एस. टी. वर्क शॉप समोर, रामवाडी) असे हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. ते दोघे सख्खे भाऊ आहेत.

नगर शहर व परिसरात सर्व सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून फुस लावून पळवून नेणे, शिवीगाळ दमदाटी करून विनयभंग करणे, खून करणे, घरात घुसून मारहाण करणे व घरातील सामानाचे नुकसान करणे, चोरी करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दमदाटी करून शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणे, घातक हत्याराने मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे अशा प्रकारचे कृत्य आकाश उर्फ अक्षय साबळे व अमोल साबळे यांच्याकडून सुरू होते. त्यांची सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. त्यांच्या विरोधात कोतवाली, तोफखाना, नगर तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी आकाश व अमोल विरोधात यापूर्वी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने नमूद टोळीतील आकाश साबळे व अमोल साबळे यांना हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी पोलीस अधीक्षक ओला यांच्याकडे पाठविला. सदर प्रस्तावाबाबत निर्णय घेत अधीक्षक ओला यांनी दोघांना दोन वर्षांकरीता हद्दपार केले आहे.

12 गंभीर गुन्हे

आकाश उर्फ अक्षय साबळे व अमोल साबळे यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात सात, कोतवाली पोलीस ठाण्यात एक, नगर तालुका पोलीस ठाण्यात तीन व एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक असे एकूण 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अधीक्षक ओला यांनी त्यांच्यावर दोन वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई केली आहे.

संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांची माहिती संकलीत करून विविध गुन्हेगारी टोळ्यांविरूध्द हद्दपारीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

राकेश ओला, पोलीस अधीक्षक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहुल

“राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर…”; भाजपाचे राहुल गांधीवर जोरदार...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि...