Monday, May 19, 2025
Homeभविष्यवेधईर्षेने प्रेरित होणे चुकीचे आहे का?

ईर्षेने प्रेरित होणे चुकीचे आहे का?

प्रश्न : सद्गुरू, ईर्षा ही नेहेमीच एक वाईट भावना म्हणून गणली गेली आहे. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मला त्याचा नेहेमीच फायदा झालेला आहे. मला त्यापासून प्रेरणा मिळते. त्यामुळे जेव्हा जेव्हा माझा मित्र एखादी नवीन गोष्ट शिकतो, तेव्हा त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याची तीव्र आंतरिक इच्छा माझ्यात निर्माण होते. आणि कदाचित त्यामुळेच मी मला हव्या तो कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकलो आहे. तर आपल्याला असे वाटते का, की ईर्षा ही एक नकारात्मक भावना आहे, का अधिक चांगली कामगिरी कारणासाठी ती तुम्हाला प्रेरित करते?

- Advertisement -

सद्गुरू : सुदैवाने आता तसे काही आढळून येत नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो, तेंव्हा छोट्या खेड्यांमध्ये गंमत म्हणून काही लोक फटाक्यांची माळ गाढवाच्या शेपटाला बांधून ठेवत. विशेषतः दिवाळीच्या वेळी हे खूप केले जायचे. जेव्हा फटाके फुटायला सुरुवात होई, तेंव्हा ते गरीब बिचारे गाढव घोड्यापेक्षा अधिक वेगाने वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावत सुटे. जीवनाला प्रेरित करण्याचा हा मार्ग आहे असे तुम्हाला वाटते का? गोष्टी साध्य करण्यासाठी त्यापेक्षा उत्तम आणि अधिक तर्कशुद्ध मार्ग उपलब्ध आहेत.

जेव्हा तुमच्या शेपटाला आग लागली आहे असे तुम्हाला वाटेल, तेव्हा कदाचित तुम्ही पळत सुटाल. लोक असे म्हणतात की जर एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करत असेल, तर तुम्ही खरोखरच खूप वेगाने धावत जाल. परंतु उसेन बोल्ट (ऑलिम्पिक धावपटू) त्याच्या शेपटाला आग लागली होती म्हणून पळाला नाही. तो पळतो कारण त्याने त्याचे पाय आणि फुफुस्से अशा प्रकारे तयार केलेली आहेत, की कोणत्याही पद्धतीने तो धावला तरीही तो इतरांपेक्षा वेगानेच पळेल. हाच धावण्याचा अगदी योग्य मार्ग नाही का? आज, तुम्हाला धावावेसे वाटते आहे कारण एखादा कुत्रा तुमच्या पाठीमागे लागला आहे किंवा तुमच्या शेपटाला आग लागलेली आहे – हा काही धावण्याचा सोयीस्कर मार्ग नाही.

आपण जोरात धावले पाहिजे हा एक भाग आहे. तो महत्त्वाचा आहे. परंतु त्यामधील आणखी एक भाग म्हणजे तुमचा धावण्याचा अनुभव झक्कास असायला हवा. हे सुद्धा महत्त्वाचे नाही का? तुम्हाला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, परंतु पुढची तीन वर्षे जणू नरक होऊ शकतात. ही तीन वर्षे अतिशय अद्भूत अनुभव असणे हे सुद्धा तुझ्यासाठी महत्त्वाचे नाही का? धावणे ही एकमेव महत्त्वाची गोष्ट नाही. धावण्याचा तुमचा अनुभव कसा आहे आणि भविष्यात त्यामधून काय निर्माण होते हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

असे समजा, की आपल्या शेपटांना आग लागल्यामुळे आपण धावलो. तर मग आपण असा निष्कर्ष लावू की लोकांना धावायला लावण्यासाठी त्यांच्या शेपटीला आग लावणे हाच एकमेव मार्ग आहे. पण त्यामुळे आपण प्रत्येकाचे किती नुकसान करू हे पाहिलंय का तुम्ही! घाबरून गेल्याने, शर्यतीच्या घोड्यांपेक्षा देखील अधिक वेगाने धावणारी अशी गाढवे मी पाहिली आहेत. पण तो काही धावण्याचा योग्य मार्ग नाही. कृपया स्वतःसोबत तसे घडू देऊ नका.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अकरावीसाठी आजपासून ऑनलाईन प्रवेश !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा नगरसह राज्यातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अकरावीसाठी 1 हजार 57 तुकड्या मंजूर असून या ठिकाणी 97...