Monday, May 5, 2025
Homeनगरशिर्डीकरांना पूर्वीप्रमाणेच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

शिर्डीकरांना पूर्वीप्रमाणेच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्यात सुरू असलेल्या वादावर पालकमंत्री तथा महसूल मंत्री विखे पाटील यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केल्याने अखेर वादावर शुक्रवारी पडदा पडला आहे. संस्थान प्रशासन व शिर्डी ग्रामस्थांनी समन्वय ठेवण्याबरोबरच शिर्डीतील ग्रामस्थांना मंदिराच्या प्रवेशद्वारातून सन्मानपूर्वक प्रवेश द्यावा, मंदीरातही पूर्वीप्रमाणे ग्रामस्थांना नंदी गेटने प्रवेश द्यावा. मंदीर प्रशासनाने या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश ना. विखे पाटील यांनी दिले. मात्र मंदिराचे पावित्र राखण्यासाठी मंदीर परिसरात चपलांवर बंदी राहील. भाविकांसाठी प्रशासनाने तातडीने सर्व प्रवेशद्वारांजवळ चप्पल स्टँड व मँट बसवण्याच्या सुचना देण्यात आल्या.

- Advertisement -

शिर्डी ग्रामस्थ व साई संस्थान प्रशासन वादाच्या पाश्वभूमीवर ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थ व प्रशासनाची एकत्रीत बैठक घेतली. बैठकीला सीईओ पी. शिवशंकर, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, दत्ता कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विलास कोते, नितीन कोते, अ‍ॅड. अनिल शेजवळ यांच्यासह शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांची भेट घेवून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. करोना संपला पण मंदिरातील निर्बंध कधी उठवणार? मंदीर परिसराच्या चार प्रवेशद्वार खुले करावे, चपला बंदी निर्णय मागे घ्यावा, ग्रामस्थांना व त्यांच्या नातेवाईकांना नंदीगेट पासून सन्मानपूर्वक दर्शन व्यवस्था पुर्ववत सुरू करावी, रुग्णालयाची दुरावस्था दूर करावी, संस्थान सुरक्षा अधिकारी व वर्षानुवर्षे साईसंस्थानमध्ये ठाण मांडून बसलेल्या प्रशासकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करावे आदी प्रश्नांवर शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

या सर्व प्रश्नावर ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत निर्णय घेवू अशी भुमिका संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी घेतली. शिर्डी ग्रामस्थांनीही ना.विखे पाटील यांच्या समोरच संस्थानबाबतचे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री बैठकीपूर्वी तासभर ना.विखे पाटील यांनी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निवडक ग्रामस्थांशी स्वतंत्र बैठक घेऊन दोन्ही बाजू समजावून घेतल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामस्थ अधिकारी यांच्या भावना समजावून घेऊन साई संस्थान अधिकार्‍यांना कामकाजात सुधारणा करण्याची सुचना केली. ग्रामस्थांना मंदिर परिसरात येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामस्थ व साई संस्थान प्रशासन यांच्यातील वादावर सकारात्मक चर्चा घडवून ना.विखे पाटील यांनी या वादावर पडदा टाकला.

संस्थानच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आजवरच्या सर्व परंपरा मोडीत काढून ग्रामस्थांचा अपमान केला आहे. सरकारने कोविड निर्बंध मागे घेतले. मात्र संस्थानच्या प्रशासनाने या निर्णयाला हरताळ फासला. मंदीर परीसरात आमची ग्रामदैवते आहेत. त्यांच्या दर्शनापासुनही वंचीत राहावे लागत आहे. ग्रामस्थांच्या विरोधात भुमिका घेणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, याचा खुलासा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी करावा. ना. विखे पाटलांनी घेतलेला निर्णय ग्रामस्थांना मान्य आहे.

कैलासबापू कोते

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ मे २०२५ – पर्यटनपूरक पाऊल

0
दिवस उन्हाळी पर्यटनाचे आहेत. तसेही अलीकडच्या काळात पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. परिणामी तिन्ही ऋतूत कुठल्या ना कुठल्या ठिकाणी पर्यटनप्रेमींचे पर्यटन सुरूच असते. ते...