Wednesday, February 4, 2026
Homeराजकीयराज ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा निर्णय निवडणुकीच्या आधी घेणार असल्याच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. राज ठाकरे तसे म्हटले असल्याचा सूर त्या बातम्यांमध्ये होता.

- Advertisement -

मात्र, यावर खुद्द राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या आधी युती करण्याबाबत आपण कुठलेही भाष्य न करता काही माध्यमांनी आपल्या तोंडी ते भाष्य घातल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरेंच्या पोस्टवर खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

YouTube video player

“राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारण्यापेक्षा महापालिका निवडणुकीनंतर काय होतं ते तुम्हाला दिसेल. राज ठाकरे यांची एक मी पोस्ट वाचली. ती वाचल्यावर त्यातले अर्थ आणि संदर्भ तुम्हाला कळायला हवे” असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेची मुलाखती घेतली आहे. त्यात ते म्हणतायत राज ठाकरे आपल्यासोबत आहेत. “का एक भाऊ दुसऱ्या भावासोबत नसावा का?. जर एका मोठ्या भावाने लहान भावाविषयी मत व्यक्त केलं, राज ठाकरे माझ्यासोबत आहे. त्यात कोणी अस्वस्थ होण्याचं कारण नाही” असं संजय राऊत म्हणाले. “उद्धव ठाकरे यांची मुलाखत पहावी, एक आदर्श मुलाखत आहे ती. अनेक विषयावर त्यांनी आपली मत स्पष्ट केली आहेत. ती मुलाखत पाहिल्यानंतर तुम्ही प्रश्न वचारा” असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी..

सस्नेह जय महाराष्ट्र,

14 आणि 15 जुलै 2025 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्यादरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.

त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का?

कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!

नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे. पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन !

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...