मुंबई | Mumbai
मेहबूबा मुफ्तीवरून टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे आज मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसले आहेत, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.
मेहबूबा मुफ्ती या विरोधकांच्या बैठकीला आल्या होत्या. ही बैठक पाटण्यात होती. जम्मू-काश्मीरमध्ये नाही. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये गेलेलो नव्हतो, असं सांगतानाच आमच्याबद्दल बोलताना जपून. आम्ही काही नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेलो नव्हतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, आम्ही काय नवाब शरीफ यांचा केक कापला नाही? किंवा मुफ्तीच्या सरकारमध्ये गेलो नाही. ते तुमचंच भूत आहे. तुमचंच पाप आहे. तोंडाच्या वाफा उगाच दडवू नका. भविष्यात या विषयावर बोलूच. उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देतीलच, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुफ्ती यांच्या मुद्द्यावरून आमच्याकडे बोट दाखवू नका. पाक व्याप्त काश्मीर भारताला जोडण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते कुठपर्यंत आलंय ते पाहा, असा चिमटा देखील राऊत यांनी फडणवीस यांना काढला आहे.
लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO
तसेच, मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. मणिपूर हिंचारावर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. मणिपूर जळत असताना मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. मणिपूर हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सर्व पक्षीय बैठक बोलण्यात आली आहे. ही बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायला हवी होती, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. असे असले तरी शिवसेनेच्या वतीने खासदार प्रियंका चतुर्वेदी त्रिवेदी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
Video : …अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क ‘चपात्या’; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?