Friday, February 6, 2026
Homeनगरमाध्यमिकच्या सर्व परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घ्याव्यात

माध्यमिकच्या सर्व परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घ्याव्यात

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

इयत्ता 1 ली ते 9 वी वार्षिक (पॅट) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन वेळापत्रकात बदल करून सर्व परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्फत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व शालेय शिक्षण प्रधान सचिव यांना पाठविले आहे. तर राज्यातील इयत्ता 1 ली ते 9 वीच्या परीक्षा मार्च ऐवजी 8 ते 25 एप्रिल दरम्यान घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शाळांची व शिक्षकांची कोंडी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 3 री ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पेट) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे वेळापत्रक सध्या निर्गमित केले आहे. संकलित चाचणी दोनचे वार्षिक परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक शिक्षकांना अनेक प्रश्न उद्भवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 25 एप्रिल 2025 ला शेवटचा पेपर ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तर पत्रिका तपासणी, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तक लिहिणे इत्यादी कामे चार ते पाच दिवसात होणे शक्य नाही. माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात एका शिक्षकाकडे किमान चार ते पाच विषयाचा कार्यभार असतो.

YouTube video player

त्यामुळे उत्तर पत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. मुंबई, ठाणे यासारख्या शहरातील शाळांमधील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत मूळ गावी अथवा बाहेरगावी जातात. बस किंवा रेल्वेचे तीन महिन्यापूर्वी आरक्षण केलेले असते. एनवेळी वेळापत्रक बदलल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा सुरु ठेवणे योग्य होणार नसल्याची भूमिका शिक्षक परिषदेच्या वतीने मांडण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

AMC : दुसर्‍या दिवशीही अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मध्य शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अहिल्यानगर महापालिकेने सलग दुसर्‍या दिवशीही जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. बुधवारी (4 फेब्रुवारी)...