Saturday, May 3, 2025
Homeनाशिकसप्तशृंगी गडावर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सुरक्षेचा आढावा

सप्तशृंगी गडावर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सुरक्षेचा आढावा

सप्तशृंगीगड / नांदुरी । वार्ताहर Saptshrungi Garh

सप्तशृंगीगड येथे लाखोंच्या संंख्येने येणार्‍या भाविकांंच्या सेवा-सुविधेत कार्यरत असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत भाविकांच्या जिवीतासह सुरक्षा उपाय योजनंच्या आढाव्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

बैठक सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तहसीलदार रोहीदास वारुळे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सल्लागार राजीव चौबे यांच्या उपस्थितीत झाली. यात आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण व आवश्यक ते मदतकार्य प्रक्रीयेचे नियंत्रण ,आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत सप्तशृंगगड नांदुरी घाट रस्त्या दरम्यान बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविक / प्रवासी महिलेस श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल नरवडे यांनी विविध शासकीय विभागांच्या अंतर्गत संभाव्य घडू नये या दृष्टीने नियोजीत असलेल्या सर्व कामकाजाचा संयुक्तीक आढावा घेवून संदर्भिय कामकाजाची आपत्ती पुर्तता आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञांच्या मार्फत योग्य ती पूर्तता करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रकारे नियंत्रण व आवश्यकते मदतकार्य या विषयाबाबत प्राप्त होणार्‍या मार्गदर्शनानुसार सतर्कतेसह विभागाची जबाबदारी मार्गदर्शन केले.

झालेल्या बस अपघाता दरम्यान विश्वस्त संस्थेने, आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापन पथक, सप्तशृंगगड व नांदुरी येथील स्थानिक ग्रामस्थ, आरोग्य विभाग, पोलिस विभाग व जिल्हा प्रशासनातील विविध विभाग यांनी केलेल्या समुह कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. विविध विभागांच्या संदर्भात आवश्यक असलेल्या संकीर्ण बाबींचे तपशील विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी उपक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविक दरम्यान नमुद केले. वर्षभरात भाविकांची गर्दी, दर्शन पध्दती, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुविधा, घाट मार्ग व ट्रेकींगचे मार्ग, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच भविष्यकाळात आपत्ती सदृश्य परिस्थिती घडू नये यासाठी राजीव चौबे यांनी संबंधीत विषय व आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने अपेक्षित असलेल्या उपाययोजनाविषयी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेसाठी तहसिलदार रोहीदास वारुळे, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहा. व्यवस्थापक भगवान नेरकर, सहा. पोलिस निरीक्षक कुलकर्णी, वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड, गटविकास अधिकारी निलेश पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ए. एच. शेख, वीज कंपनीचे नितीन आंबेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अश्विनी पवार, विकास मोरे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ संदिप बेलदार, मंडल अधिकारी विलास पगार, सरपंच रमेश पवार, ग्रामसेवक संयज देवरे, ग्रामसेवक पंडीत महाजन, ग्रामपंचायत सदस्य संदिप बेनके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे, पोलिस पाटील शशिकांत बेनके, फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प पदाधिकारी सोपान कोंडमंडले, विशाल पानमळे, उपसरपंच ताराचंद चौधरी, भालचंद्र कानडे आदींसह स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रक्रीयेतील पथकाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. संयोजन प्रकाश जोशी,भिकन वाबळे, योगेश सोनवणे, मच्छिद्र बज आदींनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आंबेवाडीत पाणीटंचाई; झर्‍यातून झिरपणार्‍या पाण्यासाठी महिलांची रांग

0
इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, स्थानिक आदिवासी महिलांना अक्षरशः जीव धोक्यात घालून दोनशे फूट खाली उतरून...