Saturday, July 27, 2024
Homeनगरदुष्काळात जनतेला वार्‍यावर सोडणार नाही

दुष्काळात जनतेला वार्‍यावर सोडणार नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या काळात तुम्हाला आम्ही वार्‍यावर सोडणार नाही, तुमच्या पाण्याची, चार्‍याची, रोजगाराची जबाबदारी पालक म्हणून आमची असेल असे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नगर तालुक्यातील सारोळा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते.

- Advertisement -

यावेळी विविध योजनांच्या लाभार्थी यांना लाभ दिल्यानंतर मेळ्यावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्याव्यास जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. विखे पाटील म्हणाले, अत्यल्प पावसामुळे नगर जिल्ह्यास गंभीर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, पिण्याला पाणी नाही, अशा परिस्थितीत विखे पाटील कुटुंब जिल्हावासियांना वार्‍यावर सोडणार नाही, तर त्यांचे पालक म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.

शासन आपल्या दारी या अभियानातून गरजुंना कोणतीच लाच न देता, कूपन, डोल, तसेच अत्यावश्यक कागदपत्रे देत असून मागील काळात याच कामासाठी हजारो रुपये खर्च करून चकरा माराव्या लागल्या होत्या. मात्र, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गरीब जनतेला योजनांचा लाभ त्यांच्या दारी मिळत आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कशा पद्धतीने आणू शकतो हे माझ्या कामातून मी दाखवले असल्याचे खा. विखे म्हणाले. यावेळी शिवाजी कर्डिले यांचे भाषण झाले. या कार्यक्रमात 1 हजार 300 पेक्षा जास्त लाभार्थीना विविध विभागाचे अत्यावश्यक असलेले दाखले, कूपन, डोल याचे वाटप करण्यात आले. मेळाव्यास राहुल शिंदे, संजय गिरवले, भोर गुरुजी, दळवी सर, लोकनियुक्त सरपंच आरती कडूस, दीपक कार्ले, छबुराव कांडेकर, सर्जेराव घाडगे, राजेंद्र आंबेकर, प्रतिक शेळके, सुधीर भोपकर, लक्ष्मण ढोकळ, अनिल आंधळे, प्रशांत गाहिले, संजय धामणे, रवींद्र कडूस, शासकीय अधिकारी, तसेच लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या