मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय नाट्य सुरू आहे. हे नाट्य मुंबईपासून सुरू झाले, नंतर ते सुरतमार्गे गुवाहाटीपर्यंत पोहोचले आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३० हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत.
- Advertisement -
त्यानंतर महाराष्ट्रातील काही उर्वरित आमदार देखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अशी राजकीय स्थिती असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. बंडखोर आमदारांनी २४ तासांत येऊन आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. ते मुंबईत बोलत होते.