Tuesday, May 20, 2025
Homeनगरशॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

- Advertisement -

राहता तालुक्यातील ममदापूर शिवारात निळवंडे कालवालगत काल दुपारी वीज वाहक तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ठिबक संचासह दोन शेतकर्‍यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर, नाशिक जिल्ह्याच्या धरणांसह जायकवाडीच्या पाण्याचा आढावा

मंगळवारी दुपारी 12.30 वाजता खंडाळा-अस्तगाव रोडलगत विज वाहकतारामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंता असल्यामुळे त्या ठिकाणी तारांमध्ये घर्षण होऊन रमेश नामदेव तरकसे यांच्या मालकीच्या गट नंबर 389 मधील दोन एकर ऊस व शेजारी असलेले वसंत नामदेव सोळंके यांचा एक एकर ऊस ठिबक संचासह जळून खाक झाला. ऊसाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच विखे पाटील कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. परंतु त्या ठिकाणी श्रीरामपूर एमआयडीसी ची 33 केव्ही व यादवमळा सबस्टेशनची 11 केव्ही ची विद्युत वाहिनी जात असल्याने अग्निशामन बांबास आग विझवण्यास अडथळा निर्माण झाला. त्या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी यादवमळा सबस्टेशनचे अभियंता यांना तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले.

ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस

परंतु तरीही गाडी जात नसल्याने उपस्थित शेतकर्‍यांनी प्रयत्न करून आग विझवली. त्यामुळे रमेश नामदेव तरकसे यांच्या चार एकरांपैकी दोन एकर व वसंत चोळके यांचा दोन एकरांपैकी एक एकर उसाचे क्षेत्र वाचले. घटनास्थळी महावितरणचे अभियंता, कर्मचारी, कामगार तलाठी यांनी दाखल होऊन पंचनामा केला. आग विझवण्यासाठी शिवाजी जवरे, ममदापूर ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गर्दे, बबलू गोरे, अनुज गोरे, हरिश्चंद्र तरकसे, सागर जवरे, नवनाथ तरकसे, सुभाष तोडके, राजेंद्र तरकसे, नवनाथ तरकसे, प्रशांत पठारे, लहानू माळी, अशोक माळी, निशांत चोळके, योगेश चोळके, रामनाथ तरकसे, किरण चोळके, आप्पासाहेब पाडांगळेल जय जवरे, मनोज पठारे, रोहित गोरे आदींनी सहकार्य केले.

आज जिल्ह्यात एकही साखर कारखाना सुरू नसल्याने या शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली आहे. महावितरणकडून वीजतारांची वेळीच देखभाल न झाल्याने शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान झाले असल्याचे शिवाजी जवरे यांनी सांगितले.

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहुल

“राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर…”; भाजपाचे राहुल गांधीवर जोरदार...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि...