Wednesday, May 28, 2025
Homeनगरव्यापारी संघटनेच्या श्रीरामपूर बंदचा ‘फज्जा’

व्यापारी संघटनेच्या श्रीरामपूर बंदचा ‘फज्जा’

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात वाढत असलेला करोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी असोसिएशनचे पुकारलेल्या चार दिवस श्रीरामपूर शहर बंदला बोटावर माजण्या इतपतच व्यापार्‍यांनी गप्रतिसाद दिला. त्यामुळे या बंदचा ‘फज्जा’ उडाल्याचे चित्र काल शहरात पहावयास मिळाले.

श्रीरामपूर शहरात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे श्रीरामपूरच्या व्यापारी असोसिएशनच्या संचालकांनी करोनाची साखळी तुटली जावी म्हणून श्रीरामपूर शहर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शहरातील काही व्यापार्‍यांनी सर्वांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करून या निर्णयाला विरोध केला.

त्यामुळे नेहमीप्रमणेसकाळी 9 वाजता बहुतांश व्यापार्‍यांनी आपले दुकाने उघडली. श्रीराम मंदिर चौकात काही व्यापार्‍यांनी हा शासनाचा बंद नसून या बंदला आमचा विरोध आहेत. त्यामुळे शहरातील दुकाने सुरु राहतील असा फलक लावल्याने अनेक व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय सुरु केले होते.

व्यापारी असो. च्या पदाधिकार्‍यांनी हा बंद स्वयंस्फूर्तीने बंद असून कुणाही सक्तीने बंद नसल्याचे जाहीर केले होते. परंतु काल काही व्यापार्‍यांनी दुकाने उघडताच काही पदाधिकार्‍यांनी फोन करुन दुकाने बंद करण्यास प्रवृत्त केले. तसेच काहींनी रोडवरुन फिरुन बंदचे आवाहन करत असताना दिसत होते. मात्र व्यापारी संघटनेच्या काही माजी पदाधिकार्‍यांचीच दुकाने उघडलेली होती.

लॉकडाउनमुळे चार महिन्यांपासून व्यापार बंद असल्याने छोटे-मोठे व्यापारी, दुकानदारांची अवस्था बिकट झाली आहे. मोठे व्यापारी होलसेलमध्ये आपल्या मालाची विक्री करून पैसे कमवितात. परंतु छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना बंद पाळण्यासारखी स्थिती नाही. बहुतांश व्यापार्‍यांनी हे बंदचे आवाहन झुगारुन आपले व्यावसाय सुरु ठेवले.

मुरकुटेंच्या मार्गदर्शनानुसारच व्यवसाय सुरु ठेवणार

लोकशाही विकास आघाडीच्या तरुण व्यावसायिकांचा निर्धार

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

शहराची बाजारपेठ अशोक उद्योग समुहामुळेच तग धरुन असल्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनानुसारच आपला व्यवसाय शासकीय सर्व नियम पाळून सुरु ठेवणार असल्याचा निर्धार लोकशाही विकास आघाडीतील तरुण व्यावसायिकांनी केला आहे.

आज श्रीरामपूरची बाजारपेठ अशोक कारखाना व उद्योग समुहामुळेच तग धरुन आहे. यापुढे लोकशाही विकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीने आघाडी मजबूत करणार असून यातील तरुण व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

हे तरुण व्यावसायिक यापुढे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालीच आपले व्यवसाय शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरु ठेवणार असल्याचे तरुण व्यावसायिक राम सिंधवाणी, मनोज दिवे, ऋषभ संचेती, रिंकू चावला, संदीप सोनवणे, यासह अनेक तरुण व्यावसायिकांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर-दौंड मार्ग 50 वर्षांत प्रथमच बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी (दि.27) पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. सुमारे चार ते पाच तास चाललेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा...