Saturday, May 4, 2024
Homeधुळेसंतप्त शेतकर्‍यांनी जामफळचे काम बंद पाडले

संतप्त शेतकर्‍यांनी जामफळचे काम बंद पाडले

सोनगीर – Songir – वार्ताहर :

तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरुन घेणार्‍या योजनेत बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना शेतजमिनीचा पुरेसा मोबदला देेण्यास शासन व प्रशासन चालढकल करीत असल्याने संतप्त शेेतकर्‍यांनी धरण क्षेत्रात जाऊन मंगळवारी (ता. 2) जामफळ धरणाचे काम बंद पाडले.

- Advertisement -

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौरे यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली. मात्र ताबडतोब मोबदला न मिळाल्यास प्रकल्पासाठी शेती देणार नाहीत, तसेच जामफळ प्रकल्पाचेे काम पुढेही बंदच ठेवू असे शेतकर्‍यांनी स्पष्ट केले.

शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमिहीन झालेल्या या शेतकर्‍यांना नवीन शेती घेेऊन पोट भरता येईल.

म्हणून त्वरीत मोबदला मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान शेतीला व फळझाडांना बाजारभावाच्या चारपट दाम देेण्याऐवजी उलट बाजारभावपेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

अनेक शेेतकर्‍यांची शेती महामार्गाला लागून आहेत. महामार्गालगत जमिनीच्या एकरी किमती 50 लाख ते एक कोटी रुपये आहे. आणि शासन दोन ते चार लाख रुपये एकरी देत आहेत. बाजारभावाप्रमाणे शेतजमिनीला पुरेसा मोबदला न मिळाल्यास शेतीतर देणार नाहीतच पण बळजबरी केल्यास धरणाचे काम कायमचे बंद पाडूू, असा इशारा सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन संघर्ष समितीने दिला आहे.

यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी भेट घेऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. शेतकर्‍यांनी धरण परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, दंंगल धनगर, ज्ञानेश्वर चौधरी, संजय परदेशी, पराग देशमुख, लखन रुपनर, संजय येवले, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, श्याम माळी, भटू धनगर, धनंजय कासार, रवींद्र माळी आदींसह महिला शेेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या