Monday, June 9, 2025
Homeराजकीयसोनिया गांधी स्थलांतरीत मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या, त्याचे काय झाले ?

सोनिया गांधी स्थलांतरीत मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या, त्याचे काय झाले ?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

भाजप BJP नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल Piush Goyal यांनी काँगेस Congress नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून रेल्वे खात्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देत त्यांनाच एक प्रश्न केला आहे.

त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे, “देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी अधिक खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचे काय झाले ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी सकाळी ट्विट करत श्रमिक स्पेशल ट्रेनवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले होते, ” सरकार आपत्तीतही नफेखोरी करत आहे. लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वार ४२८ कोटी रुपये कमावले आहे. हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे.” आता हा वाद चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Mumbai Local Train Accident : “प्रवाशांवरच मृत्यूचे खापर…”; शरद पवारांचं अपघात...

0
मुंबई | Mumbai  मध्य रेल्वेवरील (Central Railway)दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आज (दि.९ जून) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल...