Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाIND vs SA Women's U19 T20 WC : अंतिम सामन्यात भारतीय महिला...

IND vs SA Women’s U19 T20 WC : अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

विश्वचषकावर कोरले नाव

मुंबई | Mumbai

- Advertisement -

१९ वर्षांखालील महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर (World Cup) नाव कोरले आहे. सानिका चाळकेचा विजयी चौकार आणि भारताने सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद आपल्या नावे केले आहे.

भारताच्या (India) या अंतिम फेरीतील विजयात फिरकी त्रिकुटाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज गोंगाडी त्रिशा हिने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, याशिवाय तिने गोलंदाजीतही ३ गडी बाद केले. याशिवाय पारूनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा आणि आयुषी या फिरकी त्रिकुटाने भारताचा विजय अधिक सोपा केला.

नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी पार चुकीचा ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावांत गारद झाला.या सामन्यात २३ धावा ही आफ्रिकन फलंदाजांची सर्वात मोठी धावसंख्या होती. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच षटकात चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर त्यांना एकेका धावेसाठी झगडावं लागले. भारताकडून फिरकीपटूंनी ९ विकेट तर वेगवान गोलंदाजाने एकच विकेट घेतली आहे.

दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून कामालिनी (Kamalini) ही ८ धावा करत बाद झाली. तिला दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेके बाद करत संघाला एकमेव विकेट मिळवून दिली. तर सानिका आणि गोंगाडी त्रिशा या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ४८ धावांची (Run) विजयी भागीदारी केली. गोंगाडी त्रिशा हीने १३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ४४ धावांची नाबाद खेळी केली. त्रिशाच्या या खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. तर सानिकाने ४ चौकारांसह नाबाद २६ धावांची विजयी खेळी साकारली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...