Thursday, May 15, 2025
Homeभविष्यवेधश्री गजानन विजय ग्रंथ ; अध्याय : २१

श्री गजानन विजय ग्रंथ ; अध्याय : २१

ज्याची गजाननपदी एकनिष्ठा निष्ठा जडली आहे त्याच्या दुःखाची व संकटांची निःसंशय होळीच होते. मंदिराचं बांधकाम चालू असताना मंदिराच्या शिखरावर एक मजूर गवंड्याच्या हाताखाली काम करत होता. मिस्त्रीच्या हातात धोंडा देत असताना त्याचा तोल गेला व वरून खाली पडला. तो एक घडीव दगडाच्या फरसबंदीवर पडला. एवढ्या उंचावरून पडल्याने तो वाचणे अशक्यच होते असं वाटून मेला मेला असे लोक ओरडू लागले. पण आश्चर्य असं की , त्याला कोठेच मार लागला नाही. जसा चेंडू झेलतात तसंच त्याचं झालं किंवा पायरीवरून लोक जसं सहजा सहजी उतरतात तसा तो उतरला. नंतर तो लोकांना म्हणाला, जसा माझा तोल गेला तसाच माझा हात कोणीतरी घट्ट धरला पण जसा माझा पाय जमिनीला येवून लागला त्याच क्षणी ती शक्ती म्हणा किंवा कोणी परमात्मा दिसेनासा झाला. मजुराचं बोलणं ऐकून लोक अतिशय आनंदित झाले. म्हणाले, श्री समर्थ कुणाचा शाप घेणार नाहीत. तुझ्यावर दैवानुसार जेव्हा तू वरून खालील पडला होता तेव्हा श्री गजानन स्वामी समर्थानी स्पर्श करून तुला वाचवलं. तू केवढा भाग्याचा आहेस !

- Advertisement -

एक दुसर्‍या प्रसंगात जयपूरच्या एका राजपुतीन बाईला भुत प्रेताची बाधा झाली होती. तिला घरीच दत्तात्रेयांनी दृष्टांत देऊन रामनवमीला शेगांवला जा असे सांगितले व पुढे म्हणाले, तिथे श्री गजानन महाराज सद्गुरुनाथ यांची जागती ज्योत असून ते तुझ्या अंगात असलेल्या पिशाच्याला निःसंशय मुक्ति देतील. असा दृष्टांत झाल्यावर ती आपल्या दोन मुलांना घेऊन रामनवमीसाठी शेगांवला आली. प्रतिपदेपासून मोठ्या उत्सवाला आरंभ झाला होता व ठिक नवमीला अफाट जनसमुदाय शेगावला जमला. सभा मंडपाचे काम चालू होते. दगडाचे मोठमोठे खांब उभे केले होते. दीड फूट जाडीचा पांच फूट लांबीचा असे किती तरी दगडाचे खांब होते. रामनवमीच्या उत्सवाच्यानिमित्त काम जरी बंद होते तरी उभे केलेले खांब तसेच होते. तेथील गर्दीत थांगपत्ता न लागल्यामुळे ही बाई एका खांबाच्या आश्रयाने उभी राहिली. अचानकच तोच खांब कोसळून तिच्या शरीरावर पडला. ते पाहून लोकांना असे वाटले की, ही बाई आता गेली ही बाई कोण व कोठून आली हे कोणालाच माहीत नव्हतं व सोबत दोन लहान मुलंही होती. जशी ही घटना घडली तसे दहावीस जणांनी त्या बाईंच्या अंगावरून खांब काढला. बाईंच्या मुखात पाणी घालून तिला लोबो डॉक्टर बाईंकडे पाठविले.ही बाई शस्त्रविद्येत अतिप्रवीण होती , जातीने ख्रिश्चन असल्याने ती येशू ख्रिस्तांची भक्त होती. तिने ह्या रजपूत बाईंना जेव्हा तपासले तेव्हा ती म्हणाली कि यांना कुठंच काही मार लागलेला नाही. ही खरोखर फार मोठी चमत्कारिक घटना होती. तो खांब दगडाचा व खूप मोठा असल्याने त्याच्याखाली शरीर सुरक्षित कसे राहीले? हा प्रकार एवढ्यासाठीच घडला की, खांब अंगावर पाडून गजानन महाराजांनी बाईंच्या शरीरातील भुताला मुक्ति दिली.

एके दिवशी ऐन दुपारच्यावेळी महाराज गोसाव्याच्या रुपाने घरी हजर झाले. मला भूक लागली आहे व आता मला काही खायला देता का? असं म्हणत त्यांनी रामचंद्र पाटलाना हाक मारली. पाटील मुळातच भाविक होते. त्यामुळे गोसाव्याची हाक ऐकून ते कुतुहलानं दारात आले. गोसाव्यांना निरखून पाहाताच ते नक्कीच पुण्यराशी स्वामी गजानन महाराज असावेत असे त्यांना वाटले. श्री रामचंद्र पाटील गोसाव्यांचा हात धरुन त्यांना घरात घेऊन आले. त्यांना बसायला पाट दिला व पाद्यपूजा केली. गोसावी पाटलांना म्हणाले, मुला, आज मी मुद्दामहुन तुला काही सांगण्यासाठी आलो आहे, ते तू मनापासून ऐक. कर्जाची चिंता करू नकोस. ते निश्चितच फिटेल. अरे उन्हाळ्यांत गोदावरी थोडी कोरडी पडत असते तसंच हे समज. श्रीहरीचा कृपाघन वर्षल्यावर तुझ्यावर संपन्नतेला पूर येईल हे लक्षात ठेव. माझे उष्टे ज्या ठिकाणी पडेल तिथं काहीही कमी पडणार नाही. सुग्रास भोजनाचे ताट वाढून आण. मर्जीनुसार एखादे पांघरुण घाल. याचक कोणीही असो तेव्हा याचकांची पूजा करून त्यांना अन्न दक्षिणा दिल्यास ते नारायणाला पोहचते याविषयी शंका नाही पण त्यापूर्वी आधी तो याचक शुद्ध आहे याची खात्री असावी. त्या वाचून हे कौतुक होणार नाही. पाटलांनी ताट वाढून आणले व गोसावी प्रेमाने जेवले. नंतर पाटलांनी पाच रुपये दक्षिणा त्यांच्या हातावर ठेवली तेव्हा गोसावी म्हणाले, मला ही दक्षिणा नको. त्याऐवजी तू गजाननाच्या मठातला कारभार संभाळला पाहिजेस. ही दक्षिणा मागण्यासाठी मी तुझ्याकडं आलो आहे, ती आनंदानं मला दे म्हणजे तुझे कल्याण होईल. श्री गजानन स्वामी समर्थ सेवेची दक्षिणा देऊन माझ्या मनाला तुष्टी दे. हे काम करायला तुझ्याशिवाय कोणी मनुष्य सध्या येथे दिसत नाही. तुझी कांता वरचेवर आजारी पडते. ही दक्षिणा दिल्याने तीही बरी होईल. तुझ्या मुलाला बोलाव. मी त्याच्या गळ्यात एक ताईत बांधतो. म्हणजे त्याला चेटूकभूत याची बाधा होणार नाही. कारण ही जमीनदारी कठीण असते. पाण्याशीच पाणी वैरी असं येथे घडतं. कुठलं तरी भलतेच काम करायला जाऊन कुणाचा द्वेष करू घेऊ नकोस. सन्नीतीला सोडू नकोस. साधू कोण, संत कोण?हे शोधून पहा. दांभिकांच्या नादी कधीही लागू नको. ही व्रते पाळलीस तर श्रीनिवास तुझा ऋणी होईल. हे वचन कधी खोटे मानू नकोस. मिळकत पाहून खर्च कर. दंभाचार कधी करू नकोस. साधुसंत घरी आल्यावर त्याना विन्मुख करून कधी पाठवू नको. खर्‍या संतांचा अपमान झाला तर ईश्वराचा कोप होतो. आपल्या वंशज्यांच्यात काय कमी आहे हे पाहू नये. सोयर्‍याधायर्‍यांना समयानुसार मान द्यावा. राग असला तरी वरवर असावा पण अंतरी मात्र दया असावी. जसे फणसावर काटे असले तरी त्यामध्ये आत गोड गरे असतात. मी रात्रंदिवस तुझ्या पाठीशी आहे हे जाणून रहा. असं म्हणून गळ्यात ताईत बांधून गोसावी जाऊं लागला व दाराबाहेर पडताच अंतर्धान पावला. पाटील दिवसभर मनात विचार करत होते की, हा गोसावी इतर कोणी नसून स्वतः श्री गजानन स्वामीच, गोसावी वेष घेऊन मला उपदेश करण्यासाठी आले होते हे मला आतां समजले. रात्री स्वप्नात स्वामींनी त्यांच्या संशयाचे निरसन केले. असे श्री स्वामी गजानन खरे भक्तवत्सल आहेत.

श्रीगजानन चरित्र तारक असून परम पवित्र आहे. मात्र त्याचा अनुभव येण्यास सबळ निष्ठा पाहिजे. आता वेळ न घालवता या ग्रंथाची अवतरणिका देतो. ती पूर्ण सावध होऊन वाचा. प्रथम अध्यायात मंगलाचरण होऊन देव आणि गुरुना वंदन करून श्री गजाननाच्या पूर्व चरित्राबदल सांगण्यास सुरुवात केली. माघमासी सप्तमीस श्री गजानन महाराज शेगावला देवीदासाच्या सदनापाशी प्रथम दिसले. बंकटलाल आणि दामोदर ह्या दोन चतुर माणसांनी त्यांची परीक्षा केली. द्वितीय अध्यायात गोविंदबुवाच्या किर्तनांत महाराज येऊन बसले हा कथा भाग आला आहे. पुढे पितांबर शिंपी यांना रस्त्यात दाखवलेल्या चमत्काराचे वर्णन आले आहे. शेवटी महाराज बंकटलालांच्या घरी गेले. तृतीय अध्यायात एका गोसाव्याने श्री गजानन महाराजांना बुटी देऊन गांजा पाजण्याचा नवस केला. महाराजांनी त्याची इच्छा पुरविली व तेव्हापासून तेथे गांजाची प्रथा पडली. नंतर महाराजांनी स्वतःच्या पायाचे तीर्थ देऊन जानराव देशमुखाचे गंडांतर टाळले व मृत्यूचे प्रकार पण तेथे सविस्तर सांगितले. तुकाराम ढोंग करतो म्हणून त्याला मार दिला. चतुर्थाध्यायी जानकीरामाने चिलमीसाठी विस्तव दिला नाही म्हणून चिंचवण्यांत किडे पडले व त्यामुळे ते अन्न वाया गेले. ते पाहिल्यावर सोनाराने हात जोडून त्यांची विनंती केली. श्री गजानन समर्थांनी त्याच्या अपराधाची क्षमा करून चिंचवणे पूर्ववत केले. तेव्हापासून जानकीराम भक्त झाला हा प्रसंग आलेला आहे. चंदू मुकुंदाच्या पत्नीने उतरंडीला दोन कान्होले ठेवले होते तेच समर्थांनी खायला मागितले. तसेच चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाखवून मुक्त केला. पुढे शिष्याहाते वसंतपूजेचा थाट करवला इत्यादी प्रसंग विशद केलेले आहेत.पंचम अध्यायांत महाराज पिंपळगांवांजवळील जंगलात जेथे शंकराचे मंदिर होते तेथे जाऊन शंकराच्या मंदिरांत पद्मासन घालून बसले.तेथेच तेथे महाराज बसलेले दिसल्यावर गुराख्यांनीं त्यांची पूजा केली. नंतर गावातील मंडळी तेथे येऊन महाराजांना गावात घेऊन गेली. हे बंकटलालाना कळल्यावर ते पिंपळगांवास जाऊन समर्थांना परत शेगावला घेऊन आले. कांही दिवस तेथे राहून श्री गजानन महाराज भास्कराना तारण्यासाठी पुन्हा अकोलीला गेले. तेथे त्यांनी कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडून एका क्षणांत पाणी आणले. त्यामुळे भास्कराची भ्रांती नाहीशी झाली. महाराज त्यांना घेऊन शेगावला आले.

षष्ठाध्यायी असा प्रसंग आहे कि , बंकटलालांनी सद्गुरुनाथांना मक्याची कणसे खाण्याकरिता मळ्यात नेले. तेथे धुरामुळे गांधीलमाशा उठल्याने लोक जीव वाचवण्यासाठी भयभीत होऊन पळू लागले. पण महाराजांना गांधीलमाश्यांची बाधा झाली नाही. येथे महाराजांनी बकटलालालांच्या शिष्यत्वाची परीक्षा घेतली. नंतर नरसिंगजीना भेटण्याला स्वामी अकोटाला गेले. हे नरसिंगजी कोतशा अल्लीचे शिष्य होते. समर्थ काही दिवस अकोटात राहिले. तेथे त्यांनी नरसिंगजी बरोबर बंधू म्हणून हितगुज केले. पुढे चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामात व्रजभूषणावर त्यांनी कृपा केली. नंतर श्रावणमासाच्या उत्सवात मारुतीच्या मंदिरात महाराज रहायला आले.

सातव्या अध्यायात समर्थांनी पाटील मंडळींना कसे आपलेसे केले तो प्रसंग आला आहे. गावची सर्व पाटील मंडळी आडदांड होती. ती नेहमी समर्थांना टाकून बोलत. हरी पाटलासमवेत महाराज कुस्ती खेळले. उसाचा चमत्कार दाखवून महाराजांनी मल्लविद्येचे प्रत्यंतर दाखवले व पाटील मंडळींच्या अभिमानाचा परिहार केला. खंडू कडताजी पाटलांना भिक्या नावाचा मुलगा दिला. आमरस भोजनाचे व्रत चालविण्यास पाटलाना सांगितले. या सगळ्या गोष्टींमुळे पाटील मंडळींची निष्ठा समर्थांच्या ठायी जडली.

अष्टमात असा प्रसंग आहे कि, पाटील देशमुखांत दुफळी माजल्याने पाटलांच्या विरुद्ध सरकारांत देशमुखांनी अर्ज दिला. त्यामुळे खंडूवर बालंट आले. ते समर्थांनी नष्ट केले. त्यामुळे ते निर्दोष सुटले. पुढे तेलंगी ब्राह्मणाना महाराजांनी वेद म्हणून दाखवले. आपण कोण आहोत ते सहज लीलेने लोकांना जाणवून दिले. नंतर कृष्णाजीच्या मळ्यातील छपरात महाराज शंकराच्या मंदिराच्या जवळ राहिले. तेथेच त्यांनी नैनं छिन्दन्ति श्लोकाचा त्याच्या रहस्यासह अर्थ सांगून ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरहित केला. त्यासाठी जळत्या पलंगावर महाराज स्थिर बसून राहिले पण त्यांच्यावर अग्नीचा काही फरक पडला नाही. खर्‍या संताला अग्नी कधीच जाळू शकत नाही. क्रमशः

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...