Monday, May 19, 2025
Homeदेश विदेशहैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, ISISशी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, ISISशी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हैदराबादमध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना असलेल्या आयसीसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे. रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय सूरज उर रहमान आणि २८ वर्षीय सय्यद समीर हे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. दोघेही सौदी अरेबियास्थित आयसीसच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना त्यांच्याकडून अमोनिया, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडरसारखे स्फोटक पदार्थ सापडले आहेत. सिराजने विजयनगरम येथून स्फोटक पदार्थ गोळा केले होते. सध्या संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथून अटक केली आहे. यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांना संशय आल्याने रहमानला पहिले अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान, रहमानने संपूर्ण सत्य उघड केले आणि सय्यद समीरचे नावही घेतले, त्यानंतर पोलिसांनी समीरला हैदराबाद येथून ताब्यात घेतले.

बेंगळूरु येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट झाला होता, ज्यामध्ये १० जण जखमी झाले होते. तपासादरम्यान, बॉम्बस्फोटामागील दहशतवादी संघटना ISIS चा कट उघड झाला. त्यानंतर NIA टीमने बेंगळुरूसह अनेक ठिकाणी छापे टाकले. चेन्नईतील सिद्धरपेट आणि बिद्यार येथून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आत्तापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. या यादीत युट्यूबर ज्योती मल्होत्राचे नावही समाविष्ट आहे. या सर्वांवर आयसिसचे गुप्तचर एजंट असल्याचा आरोप आहे. ज्योतीवर आयसिसच्या गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात राहण्याचा आणि भारताची अनेक संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? महिना झाला, पहलगाम...

0
मुंबई । Mumbai भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन सुरू असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारला...