नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पेठ तालुक्यातील गावंधपाडासह परीसरातील छोट्या मोठ्या पाड्यांना ‘श्रीमंत धरण’ वरदानच ठरले आहे. श्रीमंत धरण नाव पडण्यामागचं कारण म्हणजे धरण होण्याआधी या ठिकाणी सपाट जमीन होती, ना झाडं होती, ना पाणी…
- Advertisement -
त्यामुळे येथील नागरिक भात शेती केल्यानंतर स्थलांतरित होऊन दुसऱ्या गावांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जात असत. मात्र धरण झाल्यानंतर या परिसरातील सर्व जमिनींना पाण्याची मोठी उपलब्धता मिळाली.
आता येथील सर्व शेतकरी बागायतदार झाले आहेत. गावंधपाडा परिसरात धरण झाले अन् शेतकऱ्यांना श्रीमंती आली. त्यामुळेच या धरणाचे नाव पडले श्रीमंत धरण पडले अशी माहिती येथील स्थानिक तुषार बिरारी यांनी दिली आहे.