Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

गेले चार आठवडे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. राज्य विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन ३० जून २०२५ पासून सुरु होईल, अशी घोषणा यावेळी दोन्ही सभागृहात करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती रॅम शिंदे यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर केले.

३ मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचा सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अधिवेशनात एकूण १६ दिवस कामकाज चालले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. याच अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...