Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजACB : तीन सरकारी कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

ACB : तीन सरकारी कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यात तीन सरकारी कर्मचारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. नागरिकांच्या करातून भरमसाठ वेतन घेऊनही लाच घेऊन लोकांना वेठीस धरणाऱ्यांना पकडल्यामुळे तालुक्यातील नागरिक आनंदी झाले आहेत.

- Advertisement -

इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे कम्प्युटर, प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याच्या मोबदल्यात २७ टक्के प्रमाणे एकूण १ लाख ९० हजार रुपयांपैकी १ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिलेली होती.

YouTube video player

त्यानुसार लाचेची मागणीची पंचांच्या समक्ष खात्री झाल्याने आरोपी नितीन दगडू लोखंडे वय ४४ पद – सफाई कामगार , इगतपुरी नगर परिषद, वर्ग -४, सुरज रविंद्र पाटील, वय ३२ ,संगणक अभियंता, इगतपुरी नगर परिषद,वर्ग-३, सोमनाथ बोराडे, लेखापाल, इगतपुरी नगर परिषद,वर्ग-३ यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ , १२ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक लाप्रवि नाशिक अमोल वालझाडे, पो. ह. संदीप हांडगे, पो. अंमलदार सुरेश चव्हाण, पो. हवा. प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक किंवा टोल फ्री क्रमांक 1064 येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनीही कारवाईचे स्वागत केले आहे. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने अथवा खासगी एजंटने काम करण्याच्या मोबदल्यात पैसे मागितल्यास लाचलुचपत विभागाशी न घाबरता संपर्क करावा असे आवाहन भगवान मधे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...