जळगाव – Jalgaon
शहरातील जुन्या औद्योगिक वसाहतीतील अयोध्यानगर येथील समृध्दी केमिकल्स या कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर) या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.
सुरक्षेचे कुठलीही उपाययोजना न करता कामगारांकडून काम करवून केल्यामुळे तिघांच्या मृत्यूस कंपनीचे मालक हेच जबाबदार असून मालक सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुुनील सुधाकर चौधरी, सुयोग सुधाकर चौधरी सर्व रा. सागर नगर, एमआयडीसी या पाचही जणांविरोधात शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी आज रविवारी सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना अटक करण्यात आली आहे.