नाशिक । प्रतिनिधी Nashik
आज (दि. 5) पासून तुलसी विवाहास ( Tulsi -Vivah )सुरुवात होणार आहे. येत्या 8 नोव्हेंबला होणारा चंंद्रग्रहण हे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देव दिवाळीच्या दिवशी होणार आहे. 16 मे 2022 रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. 8 नोव्हेंबर ही कार्तिक महिन्याची पौर्णिमा आहे.
दिवाळीत सूर्यग्रहण झाले. आता देव दिवाळीच्या दिवशी चंंद्रग्रहणाचे महत्त्व वाढले आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:32 वाजता ग्रहण सुरू होईल ते 7.27 पर्यंत चालेल.
ग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी लागतो. हे चंद्रग्रहण भारताच्या काही भागात दिसणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी असेल. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. चंद्र आणि सूर्यग्रहण ही भौगोलिक घटना असली तरी ज्योतिष शास्त्रामध्ये याला शास्त्रात खूप महत्व दिले गेले आहे.
कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुलसी विवाह सुरू होतात. 5 नोव्हेंबरला तुलसी विवाहाला सुरुवात होईल आणि 8 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेर्णिमेपर्यंत हे तुलसी विवाह साजरे केले जातात.यंदा चंद्रग्रहण संपल्यानंतर विवाह करता येणार आहेत.