Thursday, May 15, 2025
Homeभविष्यवेधगृहप्रवेश करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ?

गृहप्रवेश करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ?

नविन वर्षाचे निमित्त असो किंवा इतर शुभ कार्य या निमीत्ताने आपण घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी गृहप्रवेशाचे आयोजन करतो. सर्वांना नविन घर घेण्याची आस असते, आणि आर्थिक प्रबळता मिळाली की स्वत:चं घर आपण घेतो. घर घेतल्यावर नकारात्मकता दूर सारण्यासाठी गृहप्रवेश आणि घराची वास्तुशांती केली जाते. याच गृहप्रवेशाचे काही नियम आहेत.

तुम्ही जर गृहप्रवेश करणार असाल तर हे नियम माहित हवे…

या दिवशी शुभकार्याची सुरुवात टाळावी- आपल्या पुजार्‍याचा सल्ला घेऊन बरेच लोक गृहप्रवेश सोहळा साजरा करतात, तरीही असे काही दिवस आहेत ज्या दिवशी आपल्या शुभ कामाची सुरुवात टाळावी, जसे मालमत्ता खरेदी, वास्तूशांती इत्यादी. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण,चांद्रमास या दिवशी हे शुभ कार्य टाळावे. धर्मसिंधू या धार्मिक पुस्तकानुसार, शुक्र तारा आणि गुरु तारा अस्त वा स्थिर होतांना गृह प्रवेश करू नये. गृहप्रवेशाचा शुभदिवस आणि वेळ या स्थानावर आधारित असतात आणि म्हणूनच समारंभ सुरु करण्यापूर्वी स्थानिक पुजार्‍याचा सल्ला घ्यावा.

गृहप्रवेशाचे मुहूर्त-
हा विधी मुहूर्ताप्रमाणे सर्वप्रथम शेवटी किंवा कर्म मध्यात केला जाऊ शकतो. मुहूर्ताचं महत्त्व लक्षात घ्यावं. गणपतीचं पूजन, दारावर अंबा क्षेत्रपाल, उंबरठ्यात वास्तू, दाराच्या उजव्या बाजूस गंगानदी, डाव्या बाजूस यमुनानदी इ. पूजा कराव्यात. यजमानांनी देवपूजा साहित्य घेऊन यजमान पत्नींनी जलपूर्ण कलश घेऊन पुरुषांनी उजवा पाय महिलांनी डावा पाय टाकून गृहप्रवेश मंगल वाद्य व वेदमंत्राच्या निनादात करावा. गृहप्रवेश दिवसा करावा, रात्री करू नये. मार्गशीर्ष, फाल्गुन, वैशाख, श्रावण व उत्तराणातील महिने गृहप्रवेश करावयास उत्तम.

असा करावा गृहप्रवेश- जुन्या घराची दुरुस्ती करून गृहप्रवेश करण्यास वैशाख, मार्गशीर्ष हे महिने उत्तम. चैत्रमास, रविवार, मंगळवार, अमावस्या, रिक्त तिथी, दृष्ट चंद्र, जन्म, लग्न हे नव्या घरात जाण्यास फारच वाईट. गृहप्रवेश समयी सदाचरणी, विद्वान, ब्राह्मण आणून हातात पाण्याने भरलेली घागर घेऊन मंगल वाद्यांच्या घोषात मंत्रोच्चार करत गृहाधिकारी पुरुषाने पत्नी व कुटुंबियांसहीत गृहप्रवेश करावा. त्यानंतर शिल्पकार, पुरोहित यांची यथाशक्ती पूजा करून दक्षिणा व वस्त्रं द्यावीत. ज्या घरावर छप्पर अगर द्वारं बसवली नाहीत, अशा घरात प्रवेश अगर वस्ती करू नये.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...