Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधकुणी बाहेर गेल्यावर लगेच झाडू का मारत नाही?

कुणी बाहेर गेल्यावर लगेच झाडू का मारत नाही?

मानवी जीवनात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास मानवी जीवनात येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या दूर जाऊ शकतात. बर्‍याच वेळा या समस्या अशा असतात की आपल्याला त्या माहीत नसतात आणि नकळत आपण ती चूक पुन्हा पुन्हा करतो. अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडिलधार्‍यांकडून ऐकले असेल की, जेव्हा कोणी घरातून बाहेर पडते, तेव्हा लगेच घर झाडू नये. जर तुम्ही असे केले तर त्याचा काय परिणाम होतो, हे जाणून घेऊ या.

कुणी बाहेर गेल्यावर लगेच झाडू का मारत नाही?

- Advertisement -

मानवी जीवनात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास मानवी जीवनात येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या दूर जाऊ शकतात. बर्‍याच वेळा या समस्या अशा असतात की आपल्याला त्या माहीत नसतात आणि नकळत आपण ती चूक पुन्हा पुन्हा करतो. अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडिलधार्‍यांकडून ऐकले असेल की, जेव्हा कोणी घरातून बाहेर पडते, तेव्हा लगेच घर झाडू नये. जर तुम्ही असे केले तर त्याचा काय परिणाम होतो, हे जाणून घेऊ या.

रस्त्यात झाडू मारताना दिसल्यास – वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही कुठेतरी बाहेर जात असाल आणि त्यादरम्यान तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर ती अशुभ घटना मानली जाते. असे म्हटले जाते की अशा परिस्थितीत तुमचे काम यशस्वी होत नाही आणि त्यात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात.

कोणी गेल्यावर लगेच झाडू नका – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणताही सदस्य बाहेर जात असेल तर लगेच झाडू नये. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्ती ज्या कामासाठी जात आहे त्यात यश मिळत नाही आणि त्याचे काम बिघडण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

घरात झाडू कधी लावावे – घरातील स्वच्छता राखण्यासाठी सकाळी झाडू मारण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. सकाळी झाडू लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. त्याचवेळी, संध्याकाळी झाडू लावणे टाळावे. जो व्यक्ती सूर्यास्तानंतर झाडू मारतो, देवी लक्ष्मीच्या त्याच्यावर कोप होतो आणि त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय संध्याकाळी झाडू लावल्याने घरातील कचर्‍यासोबत सकारात्मक ऊर्जाही बाहेर जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या