Tuesday, April 29, 2025
Homeनगररॉड, तलवारीने तरूणावर हल्ला करणारे चौघे अटकेत

रॉड, तलवारीने तरूणावर हल्ला करणारे चौघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अंगावर पाणी उडाले म्हणून तरुणाला रॉड, तलवार, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणार्‍या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. चौघांनी आरिफ फकीर महंमद शेख (वय 30 रा. दगडी चाळ, मुकुंदनगर) याला मारहाण करून जखमी केले होते. 27 मे रोजी रामवाडी परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

प्रकाश उर्फ निकीता रमेश जगधने (वय 24), अमोल ज्ञानेश्वर जगधने (वय 26), राहुल रमेश जगधने (वय 19), ज्योती रमेश जगधने (वय 25, सर्व रा. विजय किराणा स्टोअरजवळ, रामवाडी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर गंभीर दुखापत, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

आरिफ शेख याचा मित्र मोहसिन शेख याला कल्याण येथे जायचे असल्याने ते दोघे दुचाकीवरून मुकुंदनगर, कोठला, रामवाडी मार्गे तारकपूर बस स्थानकाकडे जात असताना रामवाडी झोपडपट्टी भागात कपाट कारखान्यासमोर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दुचाकी गेल्याने अंगावर पाणी उडाले, म्हणून चौघांनी आरिफ शेख याला लोखंडी रॉड, लाकडी दांडके, तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून मारहाण करणारे पसार होते. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....