जळगाव – Jalgaon
जिल्ह्यात ग्रामपंचायतींतर्गत मतदान प्रक्रियेव्दारा दुपारी एक ते दिड वाजेनंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
- Advertisement -
रावेर तालुक्यात दुपारी ३ वाजेपर्यत सर्वात जास्त ५८ टक्के तर जिल्हाभरात सुमारे ४९ टक्के मतदान झाले आहे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दुपारी दिड वाजेपर्यत मतदानात आघाडीवर असलेल्या जळगाव तालुक्यात ४६ टक्क्यांच्या आत असून धरणगांव आणि जामनेर तालुक्यांसह अमळनेर आणि चोपडा तालुक्यात देखिल दुपारनंतर ५२ ते ५५ टक्केपर्यत मतदान झाले असल्याची नोंद करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.