मुंबई | Mumbai
सातारा, कोल्हापूरमधील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
- Advertisement -
सकाळी ९:१६ वाजता आलेल्या भूकंपाच्या रिक्टर स्केलची तीव्रता ३.३ असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.
कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात हा सौम्य धक्का जाणवला. अद्याप कोणत्याही प्रकाराची वित्तीय किंवा जीवित हानी झाल्याचे समोर आले नाही.
गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे.