Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूज२५ हजार कोटींच्या वसुलीसाठी अभय योजना

२५ हजार कोटींच्या वसुलीसाठी अभय योजना

विधानसभेत विधेयक सादर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे राज्य सरकारची जवळपास २५ हजार कोटी रुपयांची कर थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारने विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अभय योजना जाहीर केली. यासंदर्भातील विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले.

‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, २०२५’ असे या विधेयकाचे नाव आहे. या विधेयकामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांकडे असलेल्या थकबाकीच्या तडजोडीला गती मिळेल. त्यातून थकीत महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होऊन विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

या विधेयकात केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांना दिलासा देणाऱ्या तरतुदी आहेत. वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे आकारण्यात येणारे विविध कर यासंदर्भात ही योजना असणार आहे. विधेयक लागू झाल्याच्या दिनांकापासून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत योजना कार्यरत असेल. १ एप्रिल २००५ ते ३० जून २०१७ या कालावधीतील थकबाकी यासाठी पात्र असणार आहे. अविवादीत करासाठी कोणतीही सवलत दिली जाणार नाही, त्याचा १०० टक्के भरणा करणे अनिवार्य असणार आहे. ही संपूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...