Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसाखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतताना कारला अपघात; तिघांचा मृत्यू

साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतताना कारला अपघात; तिघांचा मृत्यू

- Advertisement -

उमराणे | प्रतिनिधी Umrane

YouTube video player

सुरत येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परत येत असतांना धुळे जिल्ह्यातील साक्री गावालगत भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून पुलावर जावून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात येथील एका विवाहितेसह आई व मुलगा जागीच ठार झाले. मृतांमध्ये साखरपुडा झालेल्या तरूणाचा देखील समावेश आहे. या घटनेने उमराणे परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातात उमराणे येथील माऊली मेन्स पार्लरचे संचालक गणेश बाजीराव पगारे यांची पत्नी प्रतिभा (२८), साखरपुडा झालेला विजय रघुनाथ जाधव (२६) व त्याची आई प्रमिला रघुनाथ जाधव (५५) यांचा गंभीररित्या जखमी झाल्याने जागीच अंत झाला.

या अपघाताचे समजलेले वृत्त असे की, येथील गणेश पगारे पत्नी प्रतिभा यांच्यासह कार क्र. एम.एच.-१५-बी.एफ.-८८१४ ने प्रतिभा यांचा चुलतभाऊ विजय जाधव यांच्या साखरपुड्यासाठी मालपूर-कासारे येथून विजय, त्यांची आई प्रमिला जाधव, महेंद्र जाधव, आणि संकेत जाधव यांना घेऊन सुरत येथे गेले होते. दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रात्री सुरतहून परत येत असताना, मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास साक्री जवळील कातरणी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडर तोडून पुलाला जावून धडकली.

धडक इतकी भीषण होती की, प्रतिभा पगारे, विजय जाधव आणि प्रमिला जाधव यांना डोयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र जाधव आणि संकेत जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मांडीवर बसलेला चारवर्षीय मुलगा वल्लभ व सहावर्षीय मुलगी कार्तिकी पगारे हे बालंबाल बचावले. या अपघाताची माहिती येथे येवून धडकताच एकच खळबळ उडून नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी साक्री येथे मदतीसाठी धाव घेतली.

आज दुपारी प्रतिभा पगारे यांच्या पार्थिव देहावर उमराणे येथे तर मालपूर-कासारे येथे विजय व प्रमिला जाधव या माय-लेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अकाली निधनाने उमराणे परिसरावर शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत नोंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व इतर व्यवस्थापनाच्या चौथी व सातवीच्या 84 हजार 704 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज...