Thursday, January 8, 2026
Homeजळगावकोरोना काळात अनिलदादांनी हजारो रुग्णांना प्राणवायू दिला-सौ.पुष्पा पाटील

कोरोना काळात अनिलदादांनी हजारो रुग्णांना प्राणवायू दिला-सौ.पुष्पा पाटील

अमळनेर । प्रतिनिधी
कोरोना काळात रुग्णांना खरी गरज होती ती ऑक्सिजन तथा प्राणवायुची आणि याचीच पुरेशी व्यवस्था भूमिपुत्र नामदार अनिल दादा पाटील यांनी केल्याने आमच्या बहिणींचे कुणाचे पती असतील कुणाची मुले असतील किंवा कुणाचे आईवडील असतील किंवा नातेवाईक असतील हे सारे वाचल्याने माझ्या सर्व लाडक्या बहिणी भूमिपुत्र अनिल दादा सोबतच असल्याचा दावा बाजार समितीच्या संचालिका सौ.पुष्पा विजय पाटील यांनी केला आहे.

याठिकाणी कोरोना काळात आणि जे माजी आमदार सेवा दिल्याचा दावा करीत आहेत त्यांनी कोणतीही परवानगी नसलेले म्हणजेच कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारे बनावट कंपनीचे रेमडिसिव्हर इंजेक्शन आणून त्याची चक्क जादा भावाने विक्री करत पैसा कमविला, यामुळे त्या रेमडिसिव्हरचे साईड इफेक्ट्स आजही असंख्य भूमिपुत्रांना भोगावे लागत आहे. सुर्देवाने त्यावेळी ही बाब काही जाणकार व्यक्तींनी भूमीपुत्र अनिल दादांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी आवाज उठविल्यानंतर सदर इंजेक्शन कंपनीवर शासनाची रेड पडून कारवाई झाली आणि अमळनेरात त्याचा पुरवठा बंद झाला. जर त्यावेळी अनिल दादांनी आवाज उठविला नसता तर मोठे विपरीत घडले असते असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळू लागताच अनिल दादांनी सानेगुरुजी शाळेत शहरातील सर्व तज्ञ डॉक्टरांच्या सहयोगाने मोठा कॅम्प घेतला, त्यानंतर रुग्ण वाढू लागताच आमदार निधीतून औषधी व सॅनिटायझर किट घेण्यासाठी ग्रामिण रुग्णालयास 15 लक्ष आणि नगरपालिका दवाखान्यास 15 लक्ष व पुन्हा तपासणी साठी अँटीजन किटसाठी 10 लक्ष रुपये दिलेत. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविला, रुग्ण संख्या प्रचंड वाढल्यावर इंदिरा भुवन येथे 70 रुग्णांना ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला.

YouTube video player

या भूमीतील अगदी पहिला रुग्ण आढळल्यापासून शेवटचा रुग्ण 100 टक्के बरा होईस्तोवर अनिलंदादाना खुलेआम सेवा देताना मतदारसंघातील संपूर्ण जनतेने पाहिले आहे. याचे साक्षीदार जनताच असल्याने अनेक कुटुंबाच्या दुवा त्यांच्यासोबत नक्कीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुमच्या म्हणण्यानुसार बरं झालं त्यांनी सूतगिरणीला 90 कोटी मिळण्याला ब्रेक मारला अन्यथा 18 ऐवजी 90 कोटी लंपास झाले असते असा टोला लगावत आमच्या सर्व लाडक्या बहिणी विकास पुरुष असलेल्या अनिल दादा पाटील यांना बहुमताने विजयी करतील असा दावा केला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....