Friday, June 13, 2025
HomeनगरAhilyanagar : जनावरांची कत्तल करणारी टोळी वर्षासाठी हद्दपार

Ahilyanagar : जनावरांची कत्तल करणारी टोळी वर्षासाठी हद्दपार

एसपी घार्गे यांनी चार्ज घेताच सलग दुसरी हद्दपारीची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोमनाथ घार्गे यांनी कठोर आणि निर्णायक कारवाईची धडाकेबाज छाप उमटवली आहे. गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी साठवणूक करणार्‍या तीन सदस्यीय टोळीविरूध्द कारवाई करत संपूर्ण टोळीला एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यापूर्वीच घार्गे यांनी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका टोळीविरूध्द हद्दपारीची कारवाई केली होती. सलग दुसर्‍या हद्दपारीच्या निर्णयामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर सर्वसामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये टोळीप्रमुख वसीम कादीर कुरेशी (वय 28, रा. हमालवाडा, झेंडीगेट, सध्या रा. नागापूर), टोळी सदस्य अदिल अमीन कुरेशी (वय 20) व शफिक नुर कुरेशी (वय 50, दोघे रा. सदर बाजार, भिंगार, सध्या रा. नागापूर) यांचा समावेश आहे. या तिघांनी मिळून एक गुन्हेगारी टोळी स्थापन केली होती. सन 2023 ते 2025 या कालावधीत त्यांनी गोवंश कत्तल, वाहतूक आणि विक्रीसंदर्भातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. याअगोदर अनेक वेळा कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात बदल झाला नव्हता. त्यांच्या गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं.

सदर टोळीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांनी सखोल चौकशी करून प्रस्तावास शिफारस केली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण घार्गे यांनी सदर तिघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारीत केले.

जिल्ह्यात संघटित गुन्हे करणार्‍या टोळ्यांविरूध्द कठोर पावले उचलण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांची माहिती संकलित करून अशांवर हद्दपारीची कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. आणखी काही टोळ्यांचीही माहिती प्राप्त झाली असून लवकरच त्यांच्याविरूध्दही अशाच प्रकारची कारवाई केली जाईल.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

केशव नामयाचा शिक्का

0
नंदन रहाणे कुठेही बाहेरगावी जायचे असले तर आधी वाटखर्चाची तरतूद करावी लागते. प्रवास म्हटला की काही ना काही पैसा हाताशी असलाच पाहिजे. आता प्रवासाची अनेक...