Friday, May 3, 2024
Homeराजकीय'बळीराजाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा'

‘बळीराजाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा’

मुंबई | Mumbai

वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे.अनेक वस्त्यांत पाणी गेलं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला असून तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल येईल त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या