Friday, May 16, 2025
Homeजळगावभाजप-सेनेतील फुटीचा काँग्रेसला फायदा

भाजप-सेनेतील फुटीचा काँग्रेसला फायदा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

पक्ष संघटनेत (party organization) गटबाजी (factionalism)) आहे की नाही? या खोलात मी जाणार नाही. संघटना बांधणे (Organizational building) हाच माझा एकमेव उद्देश (Purpose) आहे. जिल्ह्यात राजकीय परिस्थिती (political situation) बदलली आहे. एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपात (BJP) तर सेनेचे पाचही आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडली आहे. या फुटीचा आगामी काळात होणार्‍या निवडणुकीत काँग्रेसला फायदा (Congress benefited) होणार असल्याचे मत जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी विनायकराव देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेसचे प्रभारी विनायकराव देशमुख देशमुख हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर होते. आज काँग्रेस भवनात विनायकराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आ.शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, योगेंद्रसिंह पाटील, ज्ञानेश्वर कोळी, उध्दव वाणी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, प्रतिभा मोरे, विनोद कोळपकर, शहर अध्यक्ष श्याम तायडे, देवेंद्र मराठे, मुनवर खान, रवींद्र निकम, अजबराव पाटील, बाबा देशमुख, सचिन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस 50 टक्के जागा जिंकणार

प्रभारी विनायकराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपामुळे देश आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्टया आणि राजकीयदृष्टया तुटला त्याला जोडण्याचे काम खासदार राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हाती घेतले आहे. 2016 पासून मी, जळगाव जिल्ह्याचा प्रभारी राहिलेलो आहे. त्या काळची आणि आताची राजकीय परिस्थिती यात बराच बदल झाला आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फुट पडली आहे.

काँग्रेस मात्र, जळगाव जिल्ह्यात एकसंघ आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एक खासदार आणि 50 टक्के आमदार निवडुन येतील. असा विश्वास विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केला. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा जळगाव जिल्ह्याला स्पर्श होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही देशमुख यांनी व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी नाही-प्रदीप पवार

गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये बेबनाव असल्याचे वातावरण निर्माण केले गेले. मात्र, काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे. आमच्यात कुठलीही गटबाजी नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. पक्षात स्वतः काम करायचे नाही, आणि इतरांनाही करु द्यायचे नाही, पाय ओढण्याची मोडस ऑपरेंडी पक्षात रुजली आहे. काही तक्रारी असतील तर त्या, मांडल्या पाहिजेत परंतू, पक्षाला अशा पध्दतीने बदनाम करु नका असेही ते म्हणाले.

जिल्हा काँग्रेसने आतापर्यंत 77 हजार 820 सभासद नोंदणी केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस ताकदीनिशी उतरणार असल्याचे प्रदीप पवार यांनी सांगितले. आढावा बैठकीत योगेंद्रसिंह पाटील, प्रतिभा मोरे, श्याम तायडे, एरंडोलचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, चाळीसगाचे तालुकाध्यक्ष माजी आ. ईश्वर जाधव, विनोद कोळपकर, सचिन सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार जमिल शेख यांनी मानले.

जळगावचा आमदार काँग्रेसचा राहणार

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही जगात एक नंबर असून नवा विक्रम स्थापित करणार आहे. यात्रेच्या निमित्ताने तळागाळापर्यंत पुन्हा एकदा काँग्रेसचा विचार पोहचणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भुसावळसह जळगाव शहरात पुढचा आमदार काँग्रेसचा राहणार असल्याचा विश्वास प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.

विनायकराव देशमुख हे निष्ठेने काम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दौर्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या बळकटीसाठी आम्ही विनायकराव देशमुख यांच्या पाठीशी असल्याचे डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले.

भाजपा प्रवेशाच्या निव्वळ अफवा

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. राहुल गांधी देश पिंजून काढत आहे. कार्यकर्त्यांनी आपला भाग पिंजून काढावा. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा जुमल्यांचा प्रतिवाद करावा लागणार आहे. मी, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. तीन पिढ्यांपासून आम्ही काँग्रेसचे पाईक आहोत.

गद्दारी आमच्या रक्तात नाही. परंतू विरोधकांसह आपल्याच पक्षातही विष पसरवणारी माणसे आहेत. अशांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा, आम्ही चौकटी बाहेर जावून त्यांना ठिकाणावर आणू. असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीष चौधरी यांनी दिला. तसेच रावेरची जागा परंपरेने आमचीच आहे.

डॉ.उल्हास पाटील हे आमच्यासाठी माजी नसून आजी खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीने आम्हाला नेहमीच दाबले आहे. पक्ष नेतृत्वाने याबाबत दखल घ्यावी असे आवाहनही आ. शिरीष चौधरी यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...