सार्वमत
मुंबई – राज्यात आज दिवसभरात 53करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1287 नव्या रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 22, 171 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 399 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 4199 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.