Wednesday, January 7, 2026
Homeनगरअनेक ठिकाणी कपाशी वेचणीला मजूर मिळेनात

अनेक ठिकाणी कपाशी वेचणीला मजूर मिळेनात

विधानसभा निवडणुकीचा परिणाम || शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यांत कापूस वेचणीसाठी मजुरांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक अडचणीत सापडले आहेत. वाढीव दर देऊनही शेतकर्‍यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात. खरिपातील कापूस वेचणीस आला असून पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशीची वेचणी करण्यास मजुरांची वानवा आहे. दहा ते बारा रुपये प्रति किलो मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर यासह अन्य तालुक्यात सध्या शेतकरी कापसाच्या अंतिम वेचणीत व्यस्त आहेत. त्यात दिवाळी, पाडवा, भाऊबीजेची धामधूम आली. यामुळे शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे शेतमजुरांकडून मजुरीचे दर वाढविण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे अनेक ठिकाणी वाढीव मजुरी देवूनही शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांकडून कापूस वेचणीसाठी दहा रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत मजुरी देण्यात आली. मात्र, सध्या मजूर निवडणुकीच्या धुंदित दिसले.

YouTube video player

यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील सर्वच पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी जादाचे उत्पन्न मिळावे, यासाठी पिकांची मशागत व रासायनिक खते, औषधे यावर मोठा खर्च केला. मात्र, त्यानंतर सतत अवेळी झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील कपाशी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. कापसात उन्हामुळे घट होऊ नये, म्हणून शेतकरी शेतमजुरांच्या दारी खेट्या मारत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीमुळे शेतात काम करण्यासाठी कोणीही येत नसल्याने शेतकरी कुटुंबांना दिवाळी शेतातच साजरी करावी लागली आहे.

वाहन चालक ठेकेदार!
अनेक गावांतील काही मजूर परगावी जाऊन काम करत आहेत. यात वाहन चालकाकडे 15 ते 20 मजुरांचा टोळी असते. तो चालक शेतकर्‍यांकडून आधीचे पैसे घेऊन मजुरांना घेऊन जातो. त्यात त्याच्या वाहनाचेही भाडे द्यावे लागत आहे. नगर तालुक्यात मजूर मिळत नसल्याने घाटाखालून म्हणजे राहुरी, नेवासा तालुक्यातील गावातून सध्या मजुरांची वाहतूक करण्यात येत असल्याचे नगर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...