मुंबईत मुसळधार; मोडला ४६ वर्षांचा विक्रम
मुंबई | Mumbai
- Advertisement -
गेल्या दोन दिवसापासून मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मुंबईत ५, कोल्हापूर ४, सांगली २, सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १ व रायगड १ अशा एकूण १६ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या टीम राज्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.