Friday, April 25, 2025
HomeUncategorizedपुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग

पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग

वणी । वार्ताहर Vani

- Advertisement -

वणी व परिसरात गेल्या तिन दिवसांपासून पडणार्‍या सतत पावसामुळे वणी परीसरातील धरणांच्या जलाशयात वाढ झाली असून पुणेगाव धरणातून 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

वणी व परिसरात असलेल्या पुणेगाव, ओझरखेड व तिसगाव धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून पूणेगाव धरणात सुमारे 75 ते 80 टक्के पाणी साठा झाला आहे. पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. धरणातील 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती शाखाधिकारी विक्रम डावरे यांनी दिली.

ओझरखेड धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. काल सकाळी 11 वाजेपर्यंत 128 एमसीएफटी इतकी वाढ झाल्याची माहीती शाखाधिकारी भुषण कुवर यांनी दिली. तिसगाव धरणाच्या जलाशयात वाढ झाली असल्याची माहिती शाखाधिकारी वृषाली मोहीते यांनी दिली.सततच्या पडणार्‍या पावसामुळे भाताच्या लागवडीस शेतकऱ्यांनी जोमाने सुरवात केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण...