Friday, May 16, 2025
Homeभविष्यवेधघराच्या या भागात चुकूनही कुलूप लावू नये...

घराच्या या भागात चुकूनही कुलूप लावू नये…

घराच्या सुरक्षेसाठी कुलूप आणि किल्ली महत्त्वाचे असतात. कुलूपाविना कुठलेही घर किंवा दुकान अपूर्ण असतात. कुठेही राहिलो तरी आपल्या मूल्यवान संपत्तीची सुरक्षा, महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि पूर्ण घराच्या सुरक्षेसाठी कुलूपाचा वापर करतो. घरात लावलेले कुलूप मनात सुरक्षेची भावना उत्पन्न करतात. वास्तुशास्त्रात कुलूपांबद्दल बरेच नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्याने घराची सुरक्षा वाढते आणि कुठल्याही प्रकाराची चोरी किंवा नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते.

- Advertisement -

नेहमी दिशा लक्षात ठेवून कुलूप लावायला पाहिजे. पूर्वेकडे सूर्याचा स्थान असते म्हणून या दिशेत नेहमी तांब्याचे कुलूप लावायला पाहिजे. यामुळे घराची सुरक्षा वाढते आणि चोरीची भिती कमी राहते. जेव्हा की पश्चिम दिशेत नेहमी लोखंडाचे मजबूत कुलूप लावायला पाहिजे.

तसेच पश्चिम दिशेत लावण्यात आलेल्या कुलूपाचा रंग काळा असायला पाहिजे, तर चोरीचा धोका फारच कमी राहतो. या दिशेत चुकूनही तांब्याचे कुलूप नाही लावायला पाहिजे.

वास्तूनुसार, उत्तरेत पितळेचे कुलूप लावल्याने सुरक्षा वाढते. जर या दिशेत धातूचे कुलूप लावत असाल तर लक्षात ठेवा, की त्याचा रंग सोनेरी असायला पाहिजे. या दिशेत मोठे कारखाने किंवा शोरूममध्ये लागणार्‍या कुलूपांची संख्या जर पाच असेल तर चोरी आणि नुकसान होण्याची शक्यता कमी असते. दक्षिण दिशेत पाच धातूंचे कुलूप लावले किंवा जड कुलूप लावल्यास सुरक्षा वाढते. जर पंचधातूंचे कुलूप लावणे शक्य नसेल तर कुलूपावर लाल किंवा चेरी रंग लावा.

जर घर, दुकान किंवा फ्लॅट उत्तर-पूर्व मुखी असेल तर पिवळ्या रंगाच कुलूप लावायला पाहिजे. पश्चिम-पूर्वेकडे देखील लाल किंवा चेरी रंगाच कुलूप लावायला पाहिजे. दक्षिण-पश्चिम दिशेत राहूची जागा असते आणि चोरीचा धोका कमी राहतो. येथे नेहमी जाड आणि भुरकट रंगाचे कुलूप लावायला पाहिजे.

उत्तर-पश्चिम दिशेत लागणारे कुलूप चांदीच्या रंगाचे असल्याने सुरक्षा वाढते. त्याशिवाय छतावर लागणारे कुलूप निळे किंवा आसमानी रंगाचे असेल तर उत्तम. याची संख्या दोनपेक्षा जास्त असली पाहिजे. बेसमेंटमध्ये चमकदार रंगांचे कुलूप लावायला पाहिजे आणि याची संख्या एकापेक्षा जास्त असायला पाहिजे. घरातील देवघरात कधीही कुलूप लावू नये.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...