Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएल्गार परिषदेला ब्राम्हण महासंघाचा विरोध का?

एल्गार परिषदेला ब्राम्हण महासंघाचा विरोध का?

पुणे

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या परिषदेचं आयोजन स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे 30 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिल्यामुळे पुण्यातील ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्ताने 1 जानेवारी रोजी एल्गार परिषद घेण्याचे ठरले होते. परंतु, राज्य सरकारने या परिषदेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी पुण्यात एल्गार परिषद घेण्यावर ठाम भूमिका मांडली होती. त्यांनी पुण्यातील स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. त्यामुळे कोळसे पाटलांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. परंतु, या परिषदेसाठी अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ 200 व्यक्तींनाच पुणे पोलिसांकडून या परिषदेसाठी परवानी देण्यात आली आहे. त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटही पुणे पोलिसांना घातली आहे.

एल्गार परिषदेच्या विचारवंतांवर कारवाई

डिसेंबर 2017 मध्ये एल्गार परिषद पार पडली होती. या परिषदेनंतर भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध हा एल्गार परिषदेशी जोडण्यात आला होता. त्यामुळे डाव्या विचारांच्या अनेक दिग्गजांना अटक करण्यात आली. एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसंच या प्रकरणाचा NIA कडे तपास देण्यात आला आहे.

आयोजक, वक्ते, विचार हे सर्व जर तेच असतील तर पुन्हा त्या व्यासपीठावरून त्याच त्याच भूमिका मांडल्या जाण्याची शक्यता जास्त असते. भाषणास चौकट घालून बंदिस्त करता येत नाही, बोलणारा बोलून जातो आणि रेकॉर्डिंग मागवले आहे, चौकशी करू हे सरकारी उत्तर ठरलेले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभेचा अधिकार मान्य करून प्रशासनाने सर्वागीण विचार करूनच परवानगी द्यायला हवी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या