Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशEngineer's Day 2020 : जाणून घ्या 'मोक्षगुंडम विश्वेश्वरया' यांच्या बद्दल..

Engineer’s Day 2020 : जाणून घ्या ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरया’ यांच्या बद्दल..

आज राष्ट्रीय अभियंता दिन. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरयाय यांचा जन्म दिन राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (एमव्ही) यांनी भारताच्या औद्योगीकरणाच्या मुहूर्तमेढीत अनेक यशस्वी प्रकल्प प्रस्थापित केले.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.

- Advertisement -

‘मोक्षगुंडम’ हे नाव त्यांची आंध्रप्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले. त्याने त्यांचे कुटुंब हादरले. त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले. ती प्रणाली सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा धरण, ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण, म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली. त्यांना यामुळे, ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जायचे. त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रीकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. ते म्हैसूर येथे असतांना त्यांनीजनतेसाठी केलेल्या कामांमुळे, ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले.

सर मो. विश्वेश्वरय्या यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. ‘कन्स्ट्रक्टिंग इंडिया’ व ‘लॉड इकॉनोमी ऑफ इंडिया’ हे त्यांचे ग्रंथही व्यासंगपूर्ण अधयनावर आधारलेले आहे. १४ एप्रिल १९६२ रोजी साली त्यांचे वृद्धपकाळामुळे निधन झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या