Saturday, May 24, 2025
Homeधुळेमृतदेह नेतांना लोंबकाळणार्‍या तारांचा शॉक लागण्याची भिती

मृतदेह नेतांना लोंबकाळणार्‍या तारांचा शॉक लागण्याची भिती

कापडणे Kapadane। प्रतिनिधी

- Advertisement -

येथील वार्ड क्र.5 च्या होळी चौकातील (Holi Chowk) लोंबकळणार्‍या वीजतारांमुळे (Hanging power lines) तिरडी (Tirdi)अक्षरश: खाली उतरावी लागते. या तारेवरच्या कसरतीमुळे, डोली तारांना लागुन यात एखादी दुर्घंटना (Accident) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा लेखी व तोंडी मागणी करुनही वीजवितरण कंपनी (Power Distribution Company) मात्र लक्ष द्यायला तयार नाही, यामुळे रोजच प्रेताची अवहेलना पाहावयास मिळते. या भागातील ग्रामस्थांनी आता प्रतिकात्मक आंदोलनाचा इशारा दिला असुन लवकरच महावितरणाच्या कार्यालयावर तिरडी आंदोलन (Movement) करण्यात येणार आहे.

वीजतारा लोंबकळल्यामुळे ज्या ठिकाणी डोली खाली करावी लागते, त्या तारांखालीच सुधाकर पाटील यांचे घर आहे. सुधाकर पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांपासून या समस्येसंदर्भात पाठपुरावा चालविला आहे, महावितरण कंपनीचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लंक्ष होत आहे. दरम्यान दि.15 रोजी त्यांनी या तारांचा झोळ काढावा यासाठी वीजवितरणच्या शाखा अभियंत्यांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला होता, आणि दुर्देवाने दोनच दिवसांनी या समस्येचा सुधाकर पाटलांनाच सामना करावा लागला. सुधाकर पाटील यांच्या मातोश्री हिरकणबाई त्र्यंबक पाटील यांचे निधन झाले आणि तिरडी उचलतांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतुन प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

येथे वीज गायब होण्याचे प्रकार दिवसभरातून अनेकदा घडतात. येथे दिवसभरात अनेकदा बत्तीगुल होते. दिवसभरात अनेकवेळा तासानं-तास आणि रात्रभर लाईट जाण्याच्या प्रकारांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यातच गावात तसेच शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारांनी ग्रामस्थांच्या नाकी नऊ आणले आहे. अनेक ठिकाणी वीजेच्या तारा खाली आल्याने वाहनांना, रहदारीला अडथळा होतो व ग्रामस्थांना गावात तसेच शेतीत जीव मुठीत धरुन काम करावे लागते. यातच वार्ड क्र.5 च्या, होळी चौकातील लोंबकळणार्‍या वीजतारा मृतदेहाच्या अवहेलना करणार्या ठरत आहेत. या गल्लीतुन असंख्य अंत्ययात्रा जातात परंतू तारा खाली आल्यामुळे मोठी तारेवरची कसरत होते. विसावाच्या ठिकाणाशिवाय डोली खाली उतरवत नाही असा प्रथा आहे पण या तारांमुळे डोली खाली घ्यावी लागते. या प्रकारांमुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. अनेकदा विनंती करुनही त्या ओढल्या जात नसल्याने सरळ महावितरणाच्या कार्यालयावरच तिरडी आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

इंग्लंड

ENGvsIND Team Squad: मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा;...

0
मुंबई | Mumbai भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या इंग्लंड दौऱ्यात एकूण ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे....