Friday, May 3, 2024
Homeनगरगणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामविकास व पाणी बचतीचा संदेश द्यावा

गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामविकास व पाणी बचतीचा संदेश द्यावा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नगर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव कालावधीत देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामविकास व रेनवॉटर हार्वेस्टिंग, जल पुनर्भरण, पाणी बचत, जलसाक्षरता याबाबत जनजागृती करावी असे आवाहन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले आहे.

- Advertisement -

श्रीरामपूरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचे लचके तोडले

फुलारी पुढे म्हणाले, राज्यासह नगर जिल्ह्यामधील दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. यावर्षी बर्‍यापैकी पाऊस असला आणि धरणे भरली असली तरी नेहमीच सातत्याने कमी कमी होत जाणारे पर्जन्यमान, उपलब्ध पाण्याचा होणारा भरमसाठ उपसा यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनत आहे. जमीनीवर आणि जमिनीखाली उपलब्ध असलेले पाणी उपसण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.उपश्याच्या प्रमाणात भूजल पुनर्भरण ही काळाची गरज बनली आहे.

शनिशिंगणापूर रस्त्यावर चक्क श्वानांचा रास्तारोको

यासाठी राज्य शासनाने यशदाचे मार्फत जल साक्षरता केंद्राची स्थापना केलेली आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर ही जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जलसाक्षरता समित्या गठीत केल्या असून जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलसेवक, जलदूत, जलकर्मी यांचे मार्फत गावस्तरावर जलसाक्षरता निर्माण केली जात आहे.

वाजत-गाजत बाप्पांचे आगमन

गणेशोत्सव कालावधीत गणपती आणि कार्यक्रम पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे जनतेमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव कालावधीत देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमातून रेनवॉटर हार्वेस्टिंग, जल पुनर्भरण, पाणी बचत, जलसाक्षरता, अटल भूजल योजना, कॅच दि रेन, जलजीवन मिशन तसेच गाव विकासाच्या दृष्टीने जलयुक्त गाव, स्वच्छ व हरित गाव पायाभूत सुविधापूर्ण स्वयंपूर्णगाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन व प्रशासनयुक्त गाव, महिला विकासाला पूरक गाव, आरोग्यदायी गाव, बालविकासाला पूरक गाव व समृद्ध गाव या संकल्पनानांवर आधारित जनजागृती करावी असे आवाहन श्री. फुलारी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या