Tuesday, June 10, 2025
HomeनगरAhilyanagar : संघटनेतील पदाधिकारी वगळून शासकीय समित्यांवर मिळणार संधी!

Ahilyanagar : संघटनेतील पदाधिकारी वगळून शासकीय समित्यांवर मिळणार संधी!

पालकमंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतल्या कार्यकर्त्यांच्या भावना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

येत्या महिनाभरात भाजपकडून विविध शासकीय समित्यांसह पक्षाच्या विविध समित्यांवर एक हजारांहून अधिक सदस्य-कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. ही संधी देताना संबंधित कार्यकर्त्यांच्या प्रभागातून भाजपच्या निवडणुकीत उमेदवारांना किती मतदान मिळाले, हे तपासण्यात येणार आहे. कोणाचा समर्थक म्हणून कोणालाही संधी मिळणार नाही, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

भाजपच्या वतीने सोमवारी नगरमध्ये पक्षाच्या नूतन पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील होते. दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली. सुरुवातीला पालकमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी रेखा मैड यांनी बूथ कमिटीवर काम करणार्या कार्यकर्त्यांची पदे निवडणूकपूर्वी काढून घेण्यात येऊ नयेत, संजय गांगड यांनी विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोहचावीत, अनिल गटाणी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने स्वबळावर लढवावी, विद्या शिंदे यांनी घरकुलांसाठी शासकीय गायरान जमिनी उपलब्ध व्हाव्यात.

पायल ताजणे यांनी ज्या ठिकाणी भापजचे आमदार नाहीत, त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी थेट संपर्क ठेवून कामे करावीत. विलास वारदे यांनी निवडणूक लढणार्या आणि जिंकणार्या भाजपच्या नेत्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. गिता गिल्डा यांनी भाजप पदाधिकार्यांनी केवळ मंडळापूर्ते काम करू नयेत. आनंद जगताप यांनी पक्षात नवे-जुने वाद घालू नयेत. सीताराम पंधारे यांनी प्रत्येक मंडळातील पदाधिकार्यांची महिन्यात एक बैठक व्हावी. सुनील यादव यांनी कामे करणार्यांना कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळावी. बाळासाहेब गोडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी तालुका पातळीवर पदाधिकारी नेत्यांचे कान टोचावे, आदी सूचना केल्या.

पालकमंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या सूचना जाणून घेत त्यातील आवश्यक सुधारणा करण्यासोबत पक्षात पुढील महिनाभरात विविध जिल्हा व तालुका पातळीवरील शासकीय समित्यांसह पक्षाच्या अन्य समित्यांवरील सदस्यांच्या निवडी पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी इच्छुकांचे अर्ज भरून घ्यावेत. या अर्जात संबंधिताच्या प्रभागात पक्षाच्या उमेदवारांना किती मतदान झाले, याचा तपशील घ्यावा. निवडणुकीत सर्वांना मदत करण्यात येईल, मात्र करण्यात येणारी मदत ही सत्कारणी आवश्यक आहे. ज्यांनी पक्ष संघटनेत पदे घेतलेली आहेत, त्यांना वगळून शासकीय समिती व अन्य समित्यामध्ये स्थान देण्यात येईल. कोणाच्या मागे फिरतो अथवा कोणाचा माणूस म्हणून नियुक्त्या होणार नाहीत, अशा सूचना दिल्या.

नेवासा, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, पारनेरमध्ये लक्ष घालणार
नेवासा, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, पारनेरमध्ये मी स्वत: लक्ष घालणार आहे. या ठिकाणाच्या पक्षासह नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. यासह सर्व जिल्हाध्यक्षांनी येत्या दहा दिवसात आपल्या कार्यक्षेत्रात दौरा पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल पक्षाला द्यावा, अशी सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली. तसेच कार्यशाळेनंतर जिल्ह्यातील सर्व मंडळ पदाधिकार्यांशी संवाद साधला आणि त्यांना सूचना दिल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूरच्या शिंदे सेनेत ‘म्यान एक तलवारी अनेक’

0
श्रीरामपूर |अशोक गाडेकर| Shrirampur शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली...