Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र...तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कान आणि डोळे बंद केले

…तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कान आणि डोळे बंद केले

मुंबई

शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यांवर हिंदुत्ववादी नेते आणि अनेक साधू-संत टीका करत आहेत. आता अध्यात्मिक गुरु माँ कांचनगिरी यांनी उद्धव ठाकरेंवरजोरदार टीका केली. तर दुसरीकडे मनसे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

- Advertisement -

गुरु माँ कांचनगिरी आणि सूर्याचार्य हे दोघेही मुंबईत खास राज ठाकरे (raj thackeray)यांची भेट घेण्यासाठी आले होते. हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं कांचनगिरी यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचं महंतांना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मुंबईत दाखल होताच कांचनगिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. ‘उद्धव ठाकरेंवर मी काहीही बोलणार नाही. त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पूर्णपणे बुडवलं आहे. पालघरला सांधू-संतांची जी निर्घृण हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कान आणि डोळे बंद करुन घेतले होते.’ अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज ठाकरेंचे कौतूक

दुसरीकडे कांचनगिरी यांनी मात्र, राज ठाकरेंचं (raj thackeray)तोंड भरुन कौतुक केलं आहे. ‘राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते. त्यामुळे बाळासाहेबांचं संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील.’ असंही त्या म्हणाल्या आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत

उद्धव ठाकरेंवर टीका

‘मला उद्धव ठाकरेंबद्दल (uddhav thackeray)काहीही बोलायचं नाही. कारण त्यांनी आपल्या वडिलांचं नाव खराब केलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचं ते करायचे आणि ते हिंदुत्ववादी होते. जर त्यांचा संकल्प हिंदूचा होता तर एखाद्या वाघाप्रमाणे.. हिंदूप्रमाणे त्यांची डरकाळी असायची. यांच्यासारखे नाही जे मुस्लिम आहेत त्यांच्यासोबत मिळून पक्ष बनवला त्यामुळे मी उद्धव ठाकरेंवर खूप नाराज आहे.”इथे पालघरमध्ये जे कांड झालं त्यामध्ये त्यांनी आपले कान आणि डोळे बंद करुन घेतले होते.’ अशा शब्दात कांचनगिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या