Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन'या' लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

‘या’ लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

मुंबई | Mumbai

कलर्स मराठी वरील हे मन बावरे या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. अनु आणि सिद्धार्थ यांची जोडी आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

- Advertisement -

एक वेगळी लव स्टोरी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. कलर्स मराठी वाहिनीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी सम्राट या पात्राची एन्ट्री दाखवण्यात आली. जो सिद्धार्थ चा भाऊ असून त्यांची कंपनी बाल्कवण्यासाठी आलेला असतो. परंतु सानवि अनुशी हात मिळवणी करीत त्याचा हा डाव हाणून पाडते. या सोबतच काका काकूंना देखील घराबाहेर पडावे लागते. असा एकूण शेवट दाखवण्यात आला आहे. यासोबत मालिकेतील अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

हे मन बावरे या मालिकेची निर्मिती मंदर देवस्थळी यांनी केली आहे. या मालिकेतून शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस ही फ्रेश जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती देखील मिळाली.

या मालिकेच्या जागी आता केदार शिंदे यांची सुखी माणसाचा सदरा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून अभिनेता भरत जाधव बऱ्याच काळाने मालिका विश्वास कम बॅक करतो आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या