मुंबई l Mumbai
राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तावर चर्चा करत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे.
- Advertisement -
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट (Tweet) करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत दोन मंत्र्यांवरच चालणारे राज्य सरकार असंवैधानिक असल्याची टीका केली आहे.
संजय राऊत यांनी म्हंटल आहे की, ‘बार्बाडोस सारख्या देशात जिथे लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे तिथे २७ मंत्री आहेत. पण महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असूनही येथील मंत्रिमंडळात केवळ २ जण आहेत. हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी.’