Sunday, June 8, 2025
Homeअग्रलेखसार्वजनिक संपत्तीच्या रक्षणाचा अभिनव उपक्रम !

सार्वजनिक संपत्तीच्या रक्षणाचा अभिनव उपक्रम !

जंगलांना लागलेल्या वणव्यांनी जगात थैमान घातले आहे. वणव्याच्या सर्वाधिक घटना ऍमेझोनच्या खोर्‍यात घडल्याचे सांगितले जाते. पृथ्वीवरील 20 टक्के ऑक्सिजन ऍमेझोनच्या जंगलात तयार होतो असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. भारतातही जंगलांना वणवे लागत असतात. यामुळे भारताचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

गेल्या वर्षी बंदीपूर अभयारण्य आणि उत्तराखंडमधील बाम्पा जंगलात वणवा पेटला होता. त्यावेळी काही हजार हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावात यशदा मार्फत प्रशिक्षण सुरु होते. ते सुरू असतानाच गावातील रोड्याच्या डोंगरावर आग लागली होती. जंगलात अवैध शिकार आणि तस्करी देखील सुरु असते. विस्तीर्ण पसरलेल्या जंगलावर नजर ठेवणे पुरेशा मनुष्यबळाअभावी वनखात्याला शक्य होतेच असे नाही. अनेकदा वणव्याची माहिती उशिरा मिळते.

वनखात्याचे कर्मचारी पोहोचायला उशीर होतो. वारा जोरात असेल तर आग वेगाने पसरते. हा धोका टाळण्यासाठी मुंबईच्या वनखात्यातील अधिकार्‍यांनी अभिनव उपाय शोधला आहे. मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या जंगलात विविध प्रकारचे वन्यपशू व दुर्मिळ वनस्पती आहेत. या जंगलाच्या संरक्षणासाठी टाळेबंदीच्या काळात वनविभागाने म वॉरियर्स फॉर एसजीएनपीफ नावाने व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार केला आहे. त्यात उद्यानाच्या सभोवती राहणार्‍या लोकांचा समावेश केला आहे. त्यांचे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दाक्षित असे विभाग कऱण्यात आले आहेत.

हे समूह आपापल्या भागातून दिसणार्‍या जंगलावर लक्ष ठेवतात. आग लागल्याचा संशय आल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याचे गुगल लोकेशन आणि छायाचित्र काढून समूहावर पाठवतात. यानंतर संबंधित यंत्रणा कार्यान्वीत होते. या समूहातील संदेशांच्या घंटेचा आवाज वेगळा ठेवला आहे. अशा पद्धतीने काही दिवसांपूर्वी पाटलीपाडा टेकडीवरील आग तातडीने विझवण्यात यश आले. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या असे वनविभागाने माध्यमांना सांगितले. बदलत्या काळात कोणत्याही कामात लोकसहभागाशिवाय वातावरणाच्या निगराणीचा प्रयत्न यशस्वी ठरू शकणार नाही. समाजाच्या मानसिकतेत होकारात्मक बदल होण्यासाठीही लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे.

सरकारी मालमत्तेशी निगडित कोणत्याही उपक्रमात समाजाला सहभागी करून घ्यायला हवे. कुठल्याही सार्वजनिक मालमत्त्तेचे रक्षण आणि संवर्धन ही नागरिकांचीही जबाबदारी आहे ही भावनाच सार्वजिनक संपत्तीचे रक्षण सोपे करू शकेल. नागरिक म्हणून सामाजिक कर्तव्यांची जाणीव होण्यासाठीही असे उपक्रम मोलाची भूमिका बजावू शकतात. शहरातील वाहतूक, वाहनतळ, नदी प्रदूषण, उद्याने, व्यायामासाठी तयार केलेल्या जागा (जॉगींग ट्रॅक), मोकळ्या जागेत उभारलेल्या व्यायामशाळा किंवा जिम अशा अनेक उपक्रमांच्या बाबतीत हे शक्य आहे. लोकांना टवाळखोरांचा उपद्रव होतो.

तथापि दहशत किंवा गुंडगिरीमुळे लोक उघडउघड तक्रार करण्यास धजावत नाहीत. पोलिसांकडून तक्रारकर्त्याची ओळख गुप्त ठेवली गेली तर त्यांचा बंदोबस्त करण्यासही पोलिसांना लोकांचा हातभारच लागू शकेल. अशा पद्धतीने ज्या ज्या सरकारी उपक्रमांमध्ये लोकसहभाग करून घेणे शक्य आहे तिथे तिथे तसा करून घेण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : …अन् विखुरलेली भिंत झाली बोलकी; ‘सीपी व्हाट्सॲप’वर ज्येष्ठ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मद्यपि कारचालकांकडून संरक्षक भिंतीचे नुकसान आणि कारमधील तरूणांकडून दमदाटी याबाबत एक ज्येष्ठ महिलेने शहर पोलीस आयुक्तांच्या (CP Police Commissioner) 'सीपी...