Wednesday, June 4, 2025
Homeदेश विदेशAccident News : लग्न आटपून घराकडे निघालेल्या वऱ्हाडाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील...

Accident News : लग्न आटपून घराकडे निघालेल्या वऱ्हाडाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

झाबुआ । Jhabua

- Advertisement -

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सजेली फाट्याजवळ कार आणि टँकरच्या समोरासमोर हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि रस्त्यावर काचांचा खच पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका कुटुंबातील सदस्य मानपूर येथील लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नोगावा गावाजवळ सजेली फाट्यावर हा अपघात घडला. टँकर आणि कार यांची समोरासमोर धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मुकेश (वय ४०), सावली (वय ३५), विनोद (वय १६), पायल (वय १२), मढी (वय ३८), विजय भारू बामणिया (वय १४), कांता (वय १४), रागिणी (वय ९) आणि अकली (वय ३५) यांचा समावेश आहे. याशिवाय, पायल सोमला परमार (वय १९) आणि आशु (वय ५) या दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच थांदला आणि मेघनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांनीही गर्दी करत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सावली यांचा मृतदेह मेघनगरच्या शासकीय रुग्णालयात, तर इतर मृतदेह थांदला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, टँकरच्या वेगामुळे किंवा चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जखमी मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या भीषण अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू आणि दोन मुलींची गंभीर अवस्था यामुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास तीव्र केला असून, लवकरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

फोन

Sanjay Raut: संजय राऊतांचा फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी; नेमके...

0
मुंबई | Mumbai नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी आपण स्वत: तर नाराज असल्याचे सांगितले, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते...