Saturday, July 27, 2024
Homeनगरके. के. रेंजच्या भूसंपादनास राज्य सरकारची असमर्थता

के. के. रेंजच्या भूसंपादनास राज्य सरकारची असमर्थता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

के. के. रेंजसाठी होऊ घातलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्यास राज्य सरकारच असमर्थता दर्शवित असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. खा.डॉ. विखे पाटील यांनी या बैठकीत के.के.रेंजचा प्रश्न प्राधान्याने मांडला. यावेळी नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे उपस्थित होते.

नगर भिंगार कॉन्टॉमेंट परीषदेचा समावेश आता नगर महापालिका हद्दीत होण्याच्यादृष्टीने तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील सहा महिन्यात छावणी परिषदेचा समावेश महानगरपालिकेत होणार असल्याने भिंगार मधील एफएसआय व बांधकामाचा येणार्‍या अडचणीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल. नगर शहरातील छावणी परिषदेच्या जागेवर वसलेल्या रामवाडी, गोकुळवाडी, कॅम्प कौलारू, कोठला या झोपडपट्ट्यांच्या जागेच्या बदल्यात राज्य सरकार लष्कराला दुसर्‍या ठिकाणी जागा देऊन या झोपडपट्ट्यांची जागा राज्य शासनाला लष्कराकडून मिळेल यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य मिळाल्याने या भागाचा थांबलला पायाभूत विकास राज्यशासन व महानगरपालिके मार्फत होण्याचा मार्ग आता मोकळा होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील या महत्वपूर्ण निणर्यासाठी राज्यसरकारचे तसेच महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील याचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. नागरिकांची मागणी पूर्ण करणार असल्याचे समाधान खा. डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या