Tuesday, March 25, 2025
Homeनगरकर्जत तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका; सिद्धटेकचा पूल पाण्याखाली, प्रशासन सतर्क

कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका; सिद्धटेकचा पूल पाण्याखाली, प्रशासन सतर्क

कर्जत । प्रतिनिधी

खडकवासला धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा वेगाने विसर्ग सुरू असल्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नगर-पुणे जिल्ह्याला जोडणारा अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेला भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे पुणे- मुंबई भागातून या मार्गाने येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यात अडचण निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, भांबोरा, शिंपोरा, गणेशवाडी, खेड व नदीकाठच्या इतर गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कर्जत पोलीस, महसूल व आपत्कालीनची पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, तहसीलदार बिराजदार यांनी सिद्धटेक येथे जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी सिद्धटेक येथील पुलावर तैनात करण्यात आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...