Thursday, May 29, 2025
Homeनाशिकपहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ थाळींची विक्री; राज्यात १२३ केंद्र सुरु

पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ थाळींची विक्री; राज्यात १२३ केंद्र सुरु

नाशिक : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला.

- Advertisement -

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.आतापर्यंत राज्यात १२२ केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शिवभोजन ही आमच्या शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

या योजनेत अकोला २,अमरावती ३, बुलढाणा ३, वाशिम २,औरंगाबाद ४, बीड १, हिंगोलीत १, जालना २, लातूर १, नांदेड ४, उस्मानाबाद ३, परभणी २, पालघर ३, रायगड ४, रत्नागिरी ३, सिंधुदूर्ग २, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदूरबार २, नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूर ५ अशी केंद्रे सुरु झालेली आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील 45 गावे जलमय

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मागील 24 तासांत अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केडगाव व वाळकी येथे प्रत्येकी 100.5...